म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे धडे प्रशिक्षण देण्याची शासनाची घोषणा हवेतच विरली आहे. अभ्यासक्रम, कॉलेजांची तयारी, समन्वयकांची नेमणूक होऊनही अद्याप एक तासिकाही होऊ शकली नाही. पॉलिटेक्निक कॉलेजांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार होता. त्यासाठी नापास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कौशल्य विकासास पात्र, असा उल्लेखही करण्यात आला.
विद्यार्थ्यांवरील नापासचा शिक्का पुसण्यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली. दहावीत तीनपेक्षा अधिक विषयातील नापास विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पात्र ठरविण्यात आले. दहावीच्या गुणपत्रिकते खास कौशल्य विकासास पात्र, असा उल्लेख करण्यात आला आहे. उपक्रमात राज्यातील २७४ पॉलिटेक्निकमधून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय करण्यात आली. औरंगाबाद शहरातील ३ कॉलेजांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार होते. सहा महिने कालावधीच्या १६ अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली. पॉलिटेक्निकमध्ये या अभ्यासक्रमांचे धडे दिले जाणार होते. तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात नापास असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला प्रवेशही देण्यात आले. शैक्षणिक वर्ष संपले तरी, या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले गेले नाही. विद्यार्थीच येत नसल्याचे कारण आता सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख शिक्षण घेता यावे, यासाठी ही योजना पुढे आली प्रत्यक्षात अभ्यासक्रमाचे वर्गच सुरू नाहीत. पॉलिटेक्निक कॉलेजांमधील पायाभूत सुविधांचा उपयोग करून हे प्रशिक्षण दिले जाणार होते. एका बॅचमध्ये ३० विद्यार्थीचा समावेश करण्यात आला. त्यांना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण दिले जाणार होते. सुरुवातीला ऑगस्ट, त्यानंतर सप्टेंबरमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षातील दहावीचा निकाल जवळ आला, तरी मागील वर्षीचे वर्ग सुरू होऊ शकलेले नाहीत.
शाळा प्रशासनही उदासिन
दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची जबाबदारी शाळांवरही टाकण्यात आली होती. त्याबाबत प्रशिक्षण, प्रवेश प्रक्रियेबाबत तयार करण्यात आलेल्या अॅपची माहिती आदींसाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यानंतरही शाळांनी त्यात फारसा पुढाकार न दाखविला नाही. त्यामुळे ही माहितीच सर्व संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोचली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दहावीच्या गुणपत्रिकते खास कौशल्य विकासास पात्र असा उल्लेख करण्यात आला आहे. गुणपत्रिका वितरित करतावेळी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. औरंगाबाद विभागात एकूणच सर्व स्तरावर उदासिनता असल्याने येथे वर्गच सुरू होऊ शकले नाहीत.
असे अभ्यासक्रम
अनुत्तीर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास योजनेतंर्गत विविध अभ्यासक्रमाचे धडे दिले जाणार. त्यासाठी मेकॅनिकल अँड ऑटोमोबाइल टेक्निशियन, हँड एम्ब्रॉयडरी, मशिन ऑपरेटर, सिव्हिल कन्स्ट्रक्शन टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन, अन्न प्रकिय्रा, सेटअप बॉक्स इन्स्टॉलर अँड सर्व्हिस टेक्निशियन, प्लबिंग अशा अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. जवळच्या पॉलिटेक्निकमध्ये हे अभ्यासक्रम शिकविले जाणार होते. शिक्षण मंडळ, तंत्रशिक्षण मंडळ, यशस्वी अॅकॅडमी फॉर स्किल, पॉलिटेक्निक कॉलेजांच्या पुढाकारातून ही योजना राबविली जाणार असली तरी, यंदा त्याला मुहूर्त मिळालेले नाही.
दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे धडे प्रशिक्षण देण्याची शासनाची घोषणा हवेतच विरली आहे. अभ्यासक्रम, कॉलेजांची तयारी, समन्वयकांची नेमणूक होऊनही अद्याप एक तासिकाही होऊ शकली नाही. पॉलिटेक्निक कॉलेजांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार होता. त्यासाठी नापास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कौशल्य विकासास पात्र, असा उल्लेखही करण्यात आला.
विद्यार्थ्यांवरील नापासचा शिक्का पुसण्यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली. दहावीत तीनपेक्षा अधिक विषयातील नापास विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पात्र ठरविण्यात आले. दहावीच्या गुणपत्रिकते खास कौशल्य विकासास पात्र, असा उल्लेख करण्यात आला आहे. उपक्रमात राज्यातील २७४ पॉलिटेक्निकमधून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय करण्यात आली. औरंगाबाद शहरातील ३ कॉलेजांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार होते. सहा महिने कालावधीच्या १६ अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली. पॉलिटेक्निकमध्ये या अभ्यासक्रमांचे धडे दिले जाणार होते. तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात नापास असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला प्रवेशही देण्यात आले. शैक्षणिक वर्ष संपले तरी, या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले गेले नाही. विद्यार्थीच येत नसल्याचे कारण आता सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख शिक्षण घेता यावे, यासाठी ही योजना पुढे आली प्रत्यक्षात अभ्यासक्रमाचे वर्गच सुरू नाहीत. पॉलिटेक्निक कॉलेजांमधील पायाभूत सुविधांचा उपयोग करून हे प्रशिक्षण दिले जाणार होते. एका बॅचमध्ये ३० विद्यार्थीचा समावेश करण्यात आला. त्यांना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण दिले जाणार होते. सुरुवातीला ऑगस्ट, त्यानंतर सप्टेंबरमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षातील दहावीचा निकाल जवळ आला, तरी मागील वर्षीचे वर्ग सुरू होऊ शकलेले नाहीत.
शाळा प्रशासनही उदासिन
दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची जबाबदारी शाळांवरही टाकण्यात आली होती. त्याबाबत प्रशिक्षण, प्रवेश प्रक्रियेबाबत तयार करण्यात आलेल्या अॅपची माहिती आदींसाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यानंतरही शाळांनी त्यात फारसा पुढाकार न दाखविला नाही. त्यामुळे ही माहितीच सर्व संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोचली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दहावीच्या गुणपत्रिकते खास कौशल्य विकासास पात्र असा उल्लेख करण्यात आला आहे. गुणपत्रिका वितरित करतावेळी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. औरंगाबाद विभागात एकूणच सर्व स्तरावर उदासिनता असल्याने येथे वर्गच सुरू होऊ शकले नाहीत.
असे अभ्यासक्रम
अनुत्तीर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास योजनेतंर्गत विविध अभ्यासक्रमाचे धडे दिले जाणार. त्यासाठी मेकॅनिकल अँड ऑटोमोबाइल टेक्निशियन, हँड एम्ब्रॉयडरी, मशिन ऑपरेटर, सिव्हिल कन्स्ट्रक्शन टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन, अन्न प्रकिय्रा, सेटअप बॉक्स इन्स्टॉलर अँड सर्व्हिस टेक्निशियन, प्लबिंग अशा अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. जवळच्या पॉलिटेक्निकमध्ये हे अभ्यासक्रम शिकविले जाणार होते. शिक्षण मंडळ, तंत्रशिक्षण मंडळ, यशस्वी अॅकॅडमी फॉर स्किल, पॉलिटेक्निक कॉलेजांच्या पुढाकारातून ही योजना राबविली जाणार असली तरी, यंदा त्याला मुहूर्त मिळालेले नाही.