म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर शहरात झालेल्या आंदोलनाचा पहिला फटका विशेष शाखेच्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. विशेष शाखेत कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना दररोज त्यांच्या बिटामधील कारवाईची लेखी माहिती पोलिस विभागातील वरिष्ठांना कळवावी, असे आदेश पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिले आहेत.
औरंगाबाद पोलिस विभागात विशेष शाखेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांकडे माहिती संकलनाचे काम आहे. या कर्मचाऱ्यांना शहरातील उद्योग क्षेत्रापासून ते विविध धार्मिक संघटना, विविध राजकीय पक्ष आणि समाजिक संघटनांसह शहरात सुरू असलेल्या विविध घटना घडामोडींची माहिती गोळा करून सादर करावी लागते. एक जानेवारी ते तीन जानेवारी यादरम्यान औरंगाबादेत घडलेल्या घटनेची पूर्वसूचना विशेष शाखेकडे नव्हती. विशेष शाखा आणि गुप्तवार्ता शाखेसह अन्य विभागांकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती. ही माहिती आधीच मिळाली असती, तर पोलिसांना नियोजन करण्याचं नियोजन करता आले असते, अशी चर्चाही शहर पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये करण्यात आली.
शहरातील परिस्थितीची माहिती पोलिसांना आधी मिळू शकली नाही, याची पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर विशेष शाखेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना, प्रत्येक दिवशी त्यांनी केलेल्या कामाची किंवा त्यांच्या बिटात घडलेल्या घटन घडामोडींची माहिती लेखी स्वरुपात त्यांच्या वरिष्ठांकडे सादर करण्याचे आदेश पोलिस आयुक्त यादव यांनी दिले.
विशेष शाखेची रचना
पोलिस आयुक्तालयात असलेल्या विशेष शाखेची धुरा पोलिस निरीक्षकाकडे आहे. या शाखेत दोन उपनिरीक्षक आणि १५ ते २० कर्मचारी आहेत. विविध राजकीय पक्ष, राजकीय पक्षांची संबंधित संघटना, धार्मिक संघटना, विविध समाजांच्या संघटना, उद्योग क्षेत्र अशी जबाबदारी विभागून दिलेली आहे. संबंधित क्षेत्रातील अंतर्गत घडामोडी, पक्ष, संघटना, संस्था यांचे भविष्यातील उपक्रम, आंदोलने याची माहिती संकलिक करून वरिष्ठांना कळविण्याची जबाबदारी या शाखेकडे आहे.
चार्ली पथकाला प्रशिक्षण
पोलिस मुख्यालयात स्थापन करण्यात आलेल्या चार्ली पथकाला फायबर गोळीच्या रायफल चालविण्याचे ट्रेनिंग देण्यात आले. ही ट्रेनिंग वरिष्ठांच्या निगराणीत करण्यात आले.
कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर शहरात झालेल्या आंदोलनाचा पहिला फटका विशेष शाखेच्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. विशेष शाखेत कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना दररोज त्यांच्या बिटामधील कारवाईची लेखी माहिती पोलिस विभागातील वरिष्ठांना कळवावी, असे आदेश पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिले आहेत.
औरंगाबाद पोलिस विभागात विशेष शाखेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांकडे माहिती संकलनाचे काम आहे. या कर्मचाऱ्यांना शहरातील उद्योग क्षेत्रापासून ते विविध धार्मिक संघटना, विविध राजकीय पक्ष आणि समाजिक संघटनांसह शहरात सुरू असलेल्या विविध घटना घडामोडींची माहिती गोळा करून सादर करावी लागते. एक जानेवारी ते तीन जानेवारी यादरम्यान औरंगाबादेत घडलेल्या घटनेची पूर्वसूचना विशेष शाखेकडे नव्हती. विशेष शाखा आणि गुप्तवार्ता शाखेसह अन्य विभागांकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती. ही माहिती आधीच मिळाली असती, तर पोलिसांना नियोजन करण्याचं नियोजन करता आले असते, अशी चर्चाही शहर पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये करण्यात आली.
शहरातील परिस्थितीची माहिती पोलिसांना आधी मिळू शकली नाही, याची पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर विशेष शाखेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना, प्रत्येक दिवशी त्यांनी केलेल्या कामाची किंवा त्यांच्या बिटात घडलेल्या घटन घडामोडींची माहिती लेखी स्वरुपात त्यांच्या वरिष्ठांकडे सादर करण्याचे आदेश पोलिस आयुक्त यादव यांनी दिले.
विशेष शाखेची रचना
पोलिस आयुक्तालयात असलेल्या विशेष शाखेची धुरा पोलिस निरीक्षकाकडे आहे. या शाखेत दोन उपनिरीक्षक आणि १५ ते २० कर्मचारी आहेत. विविध राजकीय पक्ष, राजकीय पक्षांची संबंधित संघटना, धार्मिक संघटना, विविध समाजांच्या संघटना, उद्योग क्षेत्र अशी जबाबदारी विभागून दिलेली आहे. संबंधित क्षेत्रातील अंतर्गत घडामोडी, पक्ष, संघटना, संस्था यांचे भविष्यातील उपक्रम, आंदोलने याची माहिती संकलिक करून वरिष्ठांना कळविण्याची जबाबदारी या शाखेकडे आहे.
चार्ली पथकाला प्रशिक्षण
पोलिस मुख्यालयात स्थापन करण्यात आलेल्या चार्ली पथकाला फायबर गोळीच्या रायफल चालविण्याचे ट्रेनिंग देण्यात आले. ही ट्रेनिंग वरिष्ठांच्या निगराणीत करण्यात आले.