म. टा. वृत्तसेवा, बुलडाणा
शुकदास महाराज यांनी स्थापित केलेले विवेकानंद आश्रम हे देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरले आहे. वर्षभरात तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी आश्रमास भेट दिली आहे. आश्रमाच्यावतीने कोराडी नदीच्या जलाशयात ‘स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी’ या विवेकानंद स्मारकाचे निर्माण कार्य सुरू आहे. या स्मारकावरील विवेकानंदांचा पुतळा हा तब्बल ४० फूट उंचीचा राहणार आहे. विवेकानंदांच्या आजपर्यंतच्या पुतळ्यांत हा सर्वाधिक उंचीचा पुतळा असेल, अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली आहे.
कोराडी नदीच्या जलाशयात नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या बेटावर विवेकानंद स्मारक उभारणे हे शुकदास महाराज यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त मंडळ परिश्रम घेत आहेत. तब्बल सहा एकराचे हे बेट असून ९९ वर्षांच्या करारावर ते राज्य सरकारने विवेकानंद आश्रमास दिलेले आहे. हे बेट विकसित करण्यासाठी आश्रमाने आजपर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असून, आणखी दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
‘स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी’ असे या स्मारक प्रकल्पाचे नाव असून या स्मारकावर विवेकानंदांचा भव्य असा पुतळा उभारला जात आहे. सध्या येथे १५ फूट उंचीचा पुतळा असून, त्याची उंची ४० फूट केली जाईल, असेही गोरे यांनी सांगितले. तसेच, ध्यान केंद्र, नैसर्गिक वनराई आणि नारळाच्या झाडांची बाग, असे या स्मारकाचे स्वरुप राहणार आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर बसून ध्यान करत असल्याचा अनुभव पर्यटकांना येणार आहे. विवेकानंद स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असल्याने विवेकानंद आश्रम व हरिहरतीर्थ येथे भेट देण्यासाठी येणारे पर्यटक स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटीसही आवर्जून भेट देत आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी विवेकानंद आश्रमाचा नयनरम्य परिसर, हरिहरतीर्थ व विवेकानंद स्मारकास भेट दिली असल्याची माहितीही संतोष गोरे यांनी दिली आहे.
सरकारने सहकार्य करावे : मालपाणी
‘स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी’ या विवेकानंद स्मारकावर येणाऱ्या प्रत्येकाला विवेकानंदांच्या कार्याचा परिचय व्हावा. शुकदास महाराज यांच्या संकल्पनेतील ध्यानधारणा त्यांनी करावी व नैसर्गिक वनराईच्या सानिध्यात त्यांना आत्मबोध व्हावा, यासाठी विवेकानंद आश्रम तब्बल तीन कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चात हे विवेकानंद स्मारक साकारत आहे. या स्मारकासाठी राज्य सरकारनेही सहकार्य करावे, अशी अपेक्षा विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी व्यक्त केली आहे.
शुकदास महाराज यांनी स्थापित केलेले विवेकानंद आश्रम हे देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरले आहे. वर्षभरात तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी आश्रमास भेट दिली आहे. आश्रमाच्यावतीने कोराडी नदीच्या जलाशयात ‘स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी’ या विवेकानंद स्मारकाचे निर्माण कार्य सुरू आहे. या स्मारकावरील विवेकानंदांचा पुतळा हा तब्बल ४० फूट उंचीचा राहणार आहे. विवेकानंदांच्या आजपर्यंतच्या पुतळ्यांत हा सर्वाधिक उंचीचा पुतळा असेल, अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली आहे.
कोराडी नदीच्या जलाशयात नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या बेटावर विवेकानंद स्मारक उभारणे हे शुकदास महाराज यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त मंडळ परिश्रम घेत आहेत. तब्बल सहा एकराचे हे बेट असून ९९ वर्षांच्या करारावर ते राज्य सरकारने विवेकानंद आश्रमास दिलेले आहे. हे बेट विकसित करण्यासाठी आश्रमाने आजपर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असून, आणखी दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
‘स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी’ असे या स्मारक प्रकल्पाचे नाव असून या स्मारकावर विवेकानंदांचा भव्य असा पुतळा उभारला जात आहे. सध्या येथे १५ फूट उंचीचा पुतळा असून, त्याची उंची ४० फूट केली जाईल, असेही गोरे यांनी सांगितले. तसेच, ध्यान केंद्र, नैसर्गिक वनराई आणि नारळाच्या झाडांची बाग, असे या स्मारकाचे स्वरुप राहणार आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर बसून ध्यान करत असल्याचा अनुभव पर्यटकांना येणार आहे. विवेकानंद स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असल्याने विवेकानंद आश्रम व हरिहरतीर्थ येथे भेट देण्यासाठी येणारे पर्यटक स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटीसही आवर्जून भेट देत आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी विवेकानंद आश्रमाचा नयनरम्य परिसर, हरिहरतीर्थ व विवेकानंद स्मारकास भेट दिली असल्याची माहितीही संतोष गोरे यांनी दिली आहे.
सरकारने सहकार्य करावे : मालपाणी
‘स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी’ या विवेकानंद स्मारकावर येणाऱ्या प्रत्येकाला विवेकानंदांच्या कार्याचा परिचय व्हावा. शुकदास महाराज यांच्या संकल्पनेतील ध्यानधारणा त्यांनी करावी व नैसर्गिक वनराईच्या सानिध्यात त्यांना आत्मबोध व्हावा, यासाठी विवेकानंद आश्रम तब्बल तीन कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चात हे विवेकानंद स्मारक साकारत आहे. या स्मारकासाठी राज्य सरकारनेही सहकार्य करावे, अशी अपेक्षा विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी व्यक्त केली आहे.