म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अनुसचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती वाढवून द्या, या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या विद्यार्थी आघाडीने मंगळवारी मोर्चा काढला. क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा समाज कल्याण विभागीय आयुक्तालयावर धडकला.
समाज कल्याण विभागातर्फे मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना आहेत. या योजना राबविण्यात सरकारला अपयश येत असल्याचा आरोप मोर्चात करण्यात आला. क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चात विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महागाई निर्देशांकानुुसार शिष्यवृत्ती वाढवून मिळायला हवी, उच्चशिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ १००ऐवजी ८०० विद्यार्थ्यांना व्हावा, उच्चशिक्षण व परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीत वाढ करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करावी, वसतिगृहांची संख्या वाढवावी, वसतिगृह प्रवेशासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, अपंग, मतिमंद विद्यार्थ्यांच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी आदी विविध १९ मागण्या करण्यात आल्या. या मोर्चात राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मागण्यांच्या निवेदनावर सर्वजित बनसोडे, गणेश सुरडकर, प्रा. सुनील वाकेकर, महादू पगारे, रवी गायकवाड, विजय जाधव, प्रवीण जमधडे, अॅड. एस. आर. बोडदे, प्रा. संतोष विरकर यांची नावे आहेत.
अनुसचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती वाढवून द्या, या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या विद्यार्थी आघाडीने मंगळवारी मोर्चा काढला. क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा समाज कल्याण विभागीय आयुक्तालयावर धडकला.
समाज कल्याण विभागातर्फे मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना आहेत. या योजना राबविण्यात सरकारला अपयश येत असल्याचा आरोप मोर्चात करण्यात आला. क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चात विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महागाई निर्देशांकानुुसार शिष्यवृत्ती वाढवून मिळायला हवी, उच्चशिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ १००ऐवजी ८०० विद्यार्थ्यांना व्हावा, उच्चशिक्षण व परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीत वाढ करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करावी, वसतिगृहांची संख्या वाढवावी, वसतिगृह प्रवेशासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, अपंग, मतिमंद विद्यार्थ्यांच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी आदी विविध १९ मागण्या करण्यात आल्या. या मोर्चात राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मागण्यांच्या निवेदनावर सर्वजित बनसोडे, गणेश सुरडकर, प्रा. सुनील वाकेकर, महादू पगारे, रवी गायकवाड, विजय जाधव, प्रवीण जमधडे, अॅड. एस. आर. बोडदे, प्रा. संतोष विरकर यांची नावे आहेत.