औरंगाबाद: यावर्षी उसाचे उत्पादन अधिक असल्याने मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर अशात साखर कारखाने सुध्दा क्षमतेच्या पुढे जाऊन उसाचे गाळप करत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच बीड, उस्मानाबाद वगळता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा १० टक्क्यांपुढे गेला आहे. तर हा आकडा ९ मार्चपर्यंत असून, पुढे हा आकडा आणखी वाढू शकतो.
उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी ४६ लाख ६६ हजार ५९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून त्याच सरासरी साखर उतारा ९.५० टक्के एवढा आला आहे. लातूर जिल्ह्यातील १० कारखान्यांनी ३९ लाख ९३ हजार ५८० क्विटल साखरेचे उत्पादन असून, सरासरी साखर उतारा १०.६९ टक्के इतका आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी १९ लाख ३९ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून, सरासरी साखर उतारा १०.०८ इतका आला आहे.
वाचाः शाळेतून परतणाऱ्या मुलीचा विनयभंग; जीवे मारण्याचीही धमकी दिली
जालना जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी १८ लाख २६ हजार ९९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून, त्याचा सरासरी १०.१९ टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी २७ लाख २० हजार २४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर हिंगोली जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी १५ लाख ८५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून, सरासरी साखर उतारा १०.३१ टक्के इतका आला आहे. नांदेड जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी १७ लाख ३५ हजार ३३० क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले आहे.
वाचाः परिवहन मंत्र्यांच्या 'त्या' अल्टिमेटमनंतरही एसटी कर्मचारी संपावर कायम
शेतकरी चिंतेत...
यावर्षी पाऊस चांगला असल्याने ऊसाचे क्षेत्र सुद्धा मोठ्याप्रमाणात वाढले आहे. त्यामुळे कारखाने बंद होण्याची वेळ आली असतानाही अजूनही ऊस शेतात उभा आहे. तर अनेक ठिकानी उसाला तुरे फुटले आहे. तसेच तोड मिळत नसल्याने ऊस जळून खाक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे.
वाचाः भयंकर! १०० रुपये चोरल्याच्या संशयातून तरुणाचा निर्घृण खून; दारू विक्रेत्याचे कृत्य
उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी ४६ लाख ६६ हजार ५९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून त्याच सरासरी साखर उतारा ९.५० टक्के एवढा आला आहे. लातूर जिल्ह्यातील १० कारखान्यांनी ३९ लाख ९३ हजार ५८० क्विटल साखरेचे उत्पादन असून, सरासरी साखर उतारा १०.६९ टक्के इतका आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी १९ लाख ३९ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून, सरासरी साखर उतारा १०.०८ इतका आला आहे.
वाचाः शाळेतून परतणाऱ्या मुलीचा विनयभंग; जीवे मारण्याचीही धमकी दिली
जालना जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी १८ लाख २६ हजार ९९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून, त्याचा सरासरी १०.१९ टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी २७ लाख २० हजार २४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर हिंगोली जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी १५ लाख ८५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून, सरासरी साखर उतारा १०.३१ टक्के इतका आला आहे. नांदेड जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी १७ लाख ३५ हजार ३३० क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले आहे.
वाचाः परिवहन मंत्र्यांच्या 'त्या' अल्टिमेटमनंतरही एसटी कर्मचारी संपावर कायम
शेतकरी चिंतेत...
यावर्षी पाऊस चांगला असल्याने ऊसाचे क्षेत्र सुद्धा मोठ्याप्रमाणात वाढले आहे. त्यामुळे कारखाने बंद होण्याची वेळ आली असतानाही अजूनही ऊस शेतात उभा आहे. तर अनेक ठिकानी उसाला तुरे फुटले आहे. तसेच तोड मिळत नसल्याने ऊस जळून खाक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे.
वाचाः भयंकर! १०० रुपये चोरल्याच्या संशयातून तरुणाचा निर्घृण खून; दारू विक्रेत्याचे कृत्य