चुकीचे वीज बिल आल्यामुळे औरंगाबादमध्ये जगनाथ शेळके यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक लेखापाल आणि कनिष्ठ लेखा सहाय्यक यांना निलंबित केल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिली. या प्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे, अॅड. अनिल परब, प्रसाद लाड, विक्रम काळे यांच्यासह अन्य आमदारांनी प्रश्न विचारले होते. दरम्यान, ऑक्टोबर २०१७ ते मे २०१८ या काळात साडेतीन लाख नादुरुस्त मीटर बदलल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
वीज बिलामुळे आत्महत्या; तीन अधिकारी निलंबित
चुकीचे वीज बिल आल्यामुळे औरंगाबादमध्ये जगनाथ शेळके यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती...
Maharashtra Times 11 Jul 2018, 4:00 am