अ‍ॅपशहर

अनोळखी महिलेची घाटीकडून सुश्रुषा अन् आश्रमात आधार

म टा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Nov 2019, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनोळखी महिलेची मागच्या तब्बल तीन महिन्यांपासून शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अस्थिव्यंगोपचार विभागाच्या वॉर्ड क्रमांक १२मध्ये सुश्रुषा करण्यात आली. या काळात तिच्या नातेवाईकांचा ना शोध लागला ना एकाही नातेवाईकाने तिची साधी विचारपुस केली. त्यामु‌ळे महिलेला रेल्वे पोलिसांच्या पत्रानुसार मदर तेरेसा आश्रमात हलवून तिचे पुनर्वसन करण्यात आले.

या संदर्भातील महिलेच्या पुनर्वसनासाठी घाटीतील समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे यांनी पुढाकार घेतला. महिलेची तीन महिने सुश्रुषा केल्यानंतर तिला रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून मदत तेरेसा आश्रमात नेण्यात आले. या वेळी अधिष्ठाता डॉ़ कानन येळीकर, रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. विकास राठोड, आरएमओ डॉ. प्रीती मुसांडे, डॉ. सरफराज शेख, डॉ. संजय वाकुडकर, डॉ. राजेश खरात, डॉ. अमोल नीलेवाड, डॉ. धम्मपाल मस्के यांच्यासह रुग्णवाहिका वाहनचालक संतोषकुमार रोमन यांनी पुनर्वसनाची प्रक्रिया पार पाडली. घाटी रुग्णालयात तीन महिने वास्तव्यास असलेल्या महिलेची अस्थिव्यंगोपचार विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अजीज अन्सारी, परिसेविका सुरेखा चंद्रशेखर, वॉर्ड परिचारिका अस्मिता पवार, माधवी गोजेगावे, जयश्री घोरपडे, संध्या पाटील, वंदना तोरणे, प्रतिभा भालेराव, शिव चारुशीला, सविता ऋषी, दुर्गा गव्हाणे, नाजिया शेख, वार्ड कक्षसेवक फारुक शेख, रिता घाडगे, मीरा सांगळे, कला कुलकर्णी, चंद्रभागाबाई, साबेरा शेख, रोहन निकाळजे यांनी काळजी घेतली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज