वाळूज महानगर: सरकारने दिलेली आश्वसने पूर्ण केले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी शिवाजी महाराज चौकात गाजराची गुढी उभारून आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत काठीला गाजर बांधून त्याची गुढी उभारली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतीसाठी मोफत वीज द्यावी, बेरोजगारांना त्वरित मुद्रा कर्ज द्यावे, मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण, औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर, गंगापूर सहकारी साखर कारखाना सुरू करावा, तसेच निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वसनाने पूर्ण करावीत, असी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष संपत रोडगे, मनीष नागापुरे, विजय वैद्य, कैलास काळे, भाऊसाहेब शेळके, परमेश्वर निकम, श्रीमंत फोलाने, सोमनाथ अमोल पंडित, योगेश दंडे, रावसाहेब खुडसाने आदींची उपस्थिती होती.
‘स्वाभिमानी’ने उभरली गाजराची गुढी
सरकारने दिलेली आश्वसने पूर्ण केले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी शिवाजी महाराज चौकात गाजराची गुढी उभारून आंदोलन करण्यात आले...
Maharashtra Times 19 Mar 2018, 3:07 am