औरंगाबाद : वाहनांच्या खिडक्यावर लावण्यात येणारे ब्लॅक फिल्म वापरावर आळा घालण्याबाबत सर्वोच्च न्यायलयाने आदेश दिले आहे. या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात ब्लॅक फिल्म वापणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन विभागाकडून देण्यात आले आहे. ही कारवाई १९ मार्च ते ३१ मार्च या काळात करण्याचे आदेश दिले असून औरंगाबाद शहरात ही कारवाई सुरू असल्याची माहिती आरटीओ विभागाकडून देण्यात आली आहे.
वाहनांवर कारवाई सुरू
वाहनांच्या खिडक्यावर लावण्यात येणारे ब्लॅक फिल्म वापरावर आळा घालण्याबाबत सर्वोच्च न्यायलयाने आदेश दिले आहे.
Maharashtra Times 21 Mar 2018, 3:25 pm