औरंगाबाद - लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होईल. कदाचित युती न झाल्यास शिवसेनेचे राजकीय नुकसान होईल, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय विकास मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. जालना येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आठवले मंगळवारी शहरात आले होते. काही वेळ सुभेदारी विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशातील राजकीय बदलांवर त्यांनी भाष्य केले.
युती दोघांच्या फायद्याची
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होईल. कदाचित युती न झाल्यास शिवसेनेचे राजकीय नुकसान होईल
Maharashtra Times 13 Jun 2018, 3:15 am