अ‍ॅपशहर

खुल्या निवडणुकांचा सरकारला विसर

म टा प्रतिनिधी, औरंगाबाद 'नवीन विद्यापीठ कायद्यात खुल्या निवडणुकांचा समावेश आहे मात्र, त्या घेतल्या जात नाहीत...

Maharashtra Times 10 Jun 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'नवीन विद्यापीठ कायद्यात खुल्या निवडणुकांचा समावेश आहे. मात्र, त्या घेतल्या जात नाहीत. प्राध्यापकांच्या रिक्त जागांमुळे शिक्षणाची गुणवत्ता खालावत आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया त्वरित व्हावी यासाठी सरकार दरबारी आग्रह करू,' अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक औरंगाबादमध्ये पार पडली. त्यानंतर शैक्षणिक वर्षातील कार्यक्रमाबाबत पत्रकारांशी ते बोलत होते. डॉ. साठे म्हणाले, 'राज्यात ३० जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयांमध्ये 'सेल्फी वुईथ कॅम्पस'विशेष महाविद्यालयीन संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील प्राध्यापकांच्या, शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्या भरण्यात याव्यात. 'आयटीआय'मध्ये निदेशकांची नेमणुका करा. कषी शिक्षण हे कालसुसंगत व शेतकरीभिमुख व्हावे यासाठी ही सरकार दरबारी प्रयत्न करण्यात येतील,' असे डॉ. साठे म्हणाले. बैठकीत दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्याबाबत मागण्यांचे एक निवेदन सरकारला सादर करू असे असे प्रदेश मंत्री अभिजित पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रा. योगिता पाटील, ईश्वर अष्टेकर, स्वप्नील बेगडे, गोविंद देशपांडे यांची उपस्थिती होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज