म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणारी विद्यार्थिनी रोहिणी बोर्डे प्रतिकूल स्थितीत शिकणाऱ्या मुलांसाठी आदर्श आहे. इच्छाशक्तीच्या बळावर रोहिणीने दहावीत ९७.२० टक्के गुण मिळवले. सध्या वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या रोहिणीने प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय बाळगले आहे. गरिबीशी झुंजत शिकण्याची जिद्द असलेल्या रोहिणीला आर्थिक मदतीची गरज आहे. दात्यांच्या मदतीतूनच तिचे शिकण्याचे स्वप्न आकारास येणार आहे.
शंभूनगर वस्तीत राहत असलेल्या रोहिणी बोर्डे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ९७.२० टक्के गुण मिळवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिची शिकण्याची लढाई सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी आजारपणामुळे वडीलांचे निधन झाले. मोठा भाऊ सागर आणि रोहिणी यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारात आई निर्मला बोर्डे यांचा संघर्ष सुरू आहे. काही घरी स्वयंपाककाम करुन मुलाचे शिक्षण पूर्ण केले. भाड्याच्या दोन खोल्यांच्या घरात राहून रोहिणी अभ्यासात यशस्वी झाली. भाऊ सागर एमबीए करीत असून पार्टटाइम नोकरी करुन कुटुंबाला हातभार लावतो. अमानविश्व शाळेची विद्यार्थिनी असलेली रोहिणी शालेय पातळीवर नेहमीच अव्वल क्रमांकावर राहिली. अभ्यासात गती असलेली रोहिणी रोप स्केटींग प्रकारात राष्ट्रीय पातळीवर विजेती ठरली. खेळ आणि अभ्यासाचा समतोल साधत तिने उत्तम कामगिरी केली. स्पर्धेसाठी बाहेरगावी जायचे असल्यास शाळेतील शिक्षक खर्चासाठी मदत करीत असत. दहावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे अभ्यासाचे पुरेपूर नियोजन केले. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन होते. शिवाय घरची बेताची परिस्थिती पाहून खासगी क्लासने तिची फी माफ केली. हा तिच्यासाठी मोठा आधार ठरला. परिसरातील गोंगाटात राहूनही अभ्यासात एकाग्रता साधत तिने यश मिळवले. 'पहाटे उठून अभ्यास करणे आवडत होते. काही अडचणी आल्यास भावाला विचारत होते. सातत्यपूर्ण अभ्यासाचा फायदा झाला' असे रोहिणीने सांगितले. दहावीच्या परीक्षेत रोहिणीला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले. गणिताची आवड व गती पाहून तिने देवगिरी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आहे. चांगले शिक्षण घेण्यात कौटुंबिक अडचणी आहेत. आर्थिक पाठबळ नसल्यामुळे रोहिणीसमोर भविष्याची चिंता आहे. नातेवाईकांची परिस्थितीही जेमतेम असल्यामुळे बोर्डे कुटुंबाचा संघर्ष संपलेला नाही. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी दात्यांच्या मदतीची गरज आहे.
-----अधिकारी होण्याचे ध्येय
कौटुंबिक परिस्थितीने रोहिणीला लहानपणीच शहाणपण शिकवले. वयाच्या २१ वर्षी 'आयएएस' होण्याचे तिचे ध्येय आहे. सामान्य कुटुंबातील अन्सार शेख वयाच्या २१ वर्षी जिल्हाधिकारी झाला. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिची वाटचाल सुरू आहे. मुलीला भरपूर शिकवावे अशी तिच्या वडीलांची इच्छा होती. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी रोहिणी झपाटून अभ्यास करीत आहे.
हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणारी विद्यार्थिनी रोहिणी बोर्डे प्रतिकूल स्थितीत शिकणाऱ्या मुलांसाठी आदर्श आहे. इच्छाशक्तीच्या बळावर रोहिणीने दहावीत ९७.२० टक्के गुण मिळवले. सध्या वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या रोहिणीने प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय बाळगले आहे. गरिबीशी झुंजत शिकण्याची जिद्द असलेल्या रोहिणीला आर्थिक मदतीची गरज आहे. दात्यांच्या मदतीतूनच तिचे शिकण्याचे स्वप्न आकारास येणार आहे.
शंभूनगर वस्तीत राहत असलेल्या रोहिणी बोर्डे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ९७.२० टक्के गुण मिळवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिची शिकण्याची लढाई सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी आजारपणामुळे वडीलांचे निधन झाले. मोठा भाऊ सागर आणि रोहिणी यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारात आई निर्मला बोर्डे यांचा संघर्ष सुरू आहे. काही घरी स्वयंपाककाम करुन मुलाचे शिक्षण पूर्ण केले. भाड्याच्या दोन खोल्यांच्या घरात राहून रोहिणी अभ्यासात यशस्वी झाली. भाऊ सागर एमबीए करीत असून पार्टटाइम नोकरी करुन कुटुंबाला हातभार लावतो. अमानविश्व शाळेची विद्यार्थिनी असलेली रोहिणी शालेय पातळीवर नेहमीच अव्वल क्रमांकावर राहिली. अभ्यासात गती असलेली रोहिणी रोप स्केटींग प्रकारात राष्ट्रीय पातळीवर विजेती ठरली. खेळ आणि अभ्यासाचा समतोल साधत तिने उत्तम कामगिरी केली. स्पर्धेसाठी बाहेरगावी जायचे असल्यास शाळेतील शिक्षक खर्चासाठी मदत करीत असत. दहावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे अभ्यासाचे पुरेपूर नियोजन केले. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन होते. शिवाय घरची बेताची परिस्थिती पाहून खासगी क्लासने तिची फी माफ केली. हा तिच्यासाठी मोठा आधार ठरला. परिसरातील गोंगाटात राहूनही अभ्यासात एकाग्रता साधत तिने यश मिळवले. 'पहाटे उठून अभ्यास करणे आवडत होते. काही अडचणी आल्यास भावाला विचारत होते. सातत्यपूर्ण अभ्यासाचा फायदा झाला' असे रोहिणीने सांगितले. दहावीच्या परीक्षेत रोहिणीला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले. गणिताची आवड व गती पाहून तिने देवगिरी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आहे. चांगले शिक्षण घेण्यात कौटुंबिक अडचणी आहेत. आर्थिक पाठबळ नसल्यामुळे रोहिणीसमोर भविष्याची चिंता आहे. नातेवाईकांची परिस्थितीही जेमतेम असल्यामुळे बोर्डे कुटुंबाचा संघर्ष संपलेला नाही. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी दात्यांच्या मदतीची गरज आहे.
-----अधिकारी होण्याचे ध्येय
कौटुंबिक परिस्थितीने रोहिणीला लहानपणीच शहाणपण शिकवले. वयाच्या २१ वर्षी 'आयएएस' होण्याचे तिचे ध्येय आहे. सामान्य कुटुंबातील अन्सार शेख वयाच्या २१ वर्षी जिल्हाधिकारी झाला. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिची वाटचाल सुरू आहे. मुलीला भरपूर शिकवावे अशी तिच्या वडीलांची इच्छा होती. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी रोहिणी झपाटून अभ्यास करीत आहे.