म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बोंडअळीच्या नुकसान भरपाईपोटीचा पावणेतीनशे कोटींचा तिसऱ्या टप्प्यातील निधी प्राप्त होऊन दीड महिना झाला तरीही अद्याप वाटप रखडले असून, आतापर्यंत निम्मेच अनुदान वाटप झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बोंडअळीच्या नुकसानभरपाईचे अनुदान तीन टप्प्यांत होईल, असे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार टप्प्याटप्प्यांने अनुदानही मिळाले मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही. जून महिन्यापासून गावांच्या वर्णाक्षरानुसार अनुदानाचे वाटप करण्यात येत आहे, दोन्ही टप्प्यांतील अनुदान रक्कम बहुतांश शेतकऱ्यांना मिळाली आहे, मात्र वर्णमालेतील शेवटी अक्षर असलेल्या गावांना अद्यापही अनुदानाची प्रतीक्षा कायम होती, एक जानेवारी रोजी अनुदानाबाबत शासनादेश काढण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. ऐन दिवाळीच्या सणामध्ये आलेल्या या नुकसान भरपाईमुळे दुष्काळातील शेतकऱ्यांची दिवाळी तरी गोड होईल, असे वाटले होते, मात्र अद्याप तिसऱ्या टप्प्यातील निम्म्या गावांमध्ये अनुदान वाटप झालेच नाही. बोंडअळी अनुदानानंतर आता येत्या काही दिवसांमध्ये दुष्काळाचा निधी वाटप करण्यात येणार असून, त्यापूर्वी बोंडअळी अनुदान वाटपाचे काम संपवावे लागणार आहे. कापूस व धान पिकावर किडीच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी मराठवाड्याची एकूण १२२१ कोटी चार लाख रुपयांची मागणी होती. विभागात दोन टप्प्यांमध्ये ८१४ कोटी रुपयांचे वाटप झाल्यानंतर करण्यात आलेल्या फेरतपासणीमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी अनुदान कमी लागणार असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. तिसऱ्या टप्प्यासाठी लातूर वगळता इतर जिल्ह्यांची सुधारित मागणी शासनाकडे करण्यात आली होती. या मागणीनुसार २८२ कोटी ५७ लाख रुपयांचा तिसरा आणि अंतिम टप्प्याच्या नुकसान भरपाईची रक्कम विभागीय प्रशासनाला प्राप्त झाली, त्यानंतर ही रक्कम त्या-त्या जिल्ह्यांना वितरित करण्यात आली होती.
खरीप २०१७ हंगामामध्ये मराठवाड्यातील एकूण ४७ लाख ७० हजार २०० हेक्टरपैकी १५ लाख ८२ हजार ६७९ हेक्टरवर कापसाचे पीक घेण्यात आले. बाधित असलेल्या २६ लाख ९० हजार ९३९ शेतकऱ्यांसाठी १२२१ कोटी चार लाख रुपये नुकसान भरपाईची आवश्यकता असल्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आल्यानंतर ही रक्कम मंजूर करण्यात आली होती.
\Bमे, जून महिन्यात मिळाले होते दोन हप्ते\B
मराठवाड्याला नऊ मे रोजी ४०७ कोटी एक लाख रुपयांच्या अनुदानाचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला. यापैकी ३२५ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम त्या-त्या जिल्ह्यांना वितरित करण्यात आली. १३ जुलै रोजी मिळालेल्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये ४०७ कोटी; तसेच पहिल्या टप्प्यातील शिल्लक ८१ कोटी असे ४८८ कोटी रुपयांचे वाटपही पूर्ण करण्यात आले होते. आता २४ ऑक्टोबरला मिळालेल्या २८२ कोटी ५७ लाख रुपयांच्या तिसऱ्या आणि अंतिम हप्त्याचे वाटपही गेल्या चाळीस दिवसांपासून सुरू आहे.
\Bजिल्हानिहाय तिसऱ्या टप्प्यातील प्राप्त रक्कम\B
जिल्हा....................रक्कम
औरंगाबाद.......८८ कोटी ५३ लाख
बीड...............८५ कोटी ५३ लाख
जालना...........९१ कोटी ७९ लाख
उस्मानाबाद.....४ कोटी ५१ लाख
हिंगोली...........१२ कोटी २० लाख
परभणी...........४६ कोटी ८५ लाख
नांदेड............४१ कोटी ९३ लाख
लातूर.................. मागणी नाही
बोंडअळीच्या नुकसान भरपाईपोटीचा पावणेतीनशे कोटींचा तिसऱ्या टप्प्यातील निधी प्राप्त होऊन दीड महिना झाला तरीही अद्याप वाटप रखडले असून, आतापर्यंत निम्मेच अनुदान वाटप झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बोंडअळीच्या नुकसानभरपाईचे अनुदान तीन टप्प्यांत होईल, असे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार टप्प्याटप्प्यांने अनुदानही मिळाले मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही. जून महिन्यापासून गावांच्या वर्णाक्षरानुसार अनुदानाचे वाटप करण्यात येत आहे, दोन्ही टप्प्यांतील अनुदान रक्कम बहुतांश शेतकऱ्यांना मिळाली आहे, मात्र वर्णमालेतील शेवटी अक्षर असलेल्या गावांना अद्यापही अनुदानाची प्रतीक्षा कायम होती, एक जानेवारी रोजी अनुदानाबाबत शासनादेश काढण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. ऐन दिवाळीच्या सणामध्ये आलेल्या या नुकसान भरपाईमुळे दुष्काळातील शेतकऱ्यांची दिवाळी तरी गोड होईल, असे वाटले होते, मात्र अद्याप तिसऱ्या टप्प्यातील निम्म्या गावांमध्ये अनुदान वाटप झालेच नाही. बोंडअळी अनुदानानंतर आता येत्या काही दिवसांमध्ये दुष्काळाचा निधी वाटप करण्यात येणार असून, त्यापूर्वी बोंडअळी अनुदान वाटपाचे काम संपवावे लागणार आहे. कापूस व धान पिकावर किडीच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी मराठवाड्याची एकूण १२२१ कोटी चार लाख रुपयांची मागणी होती. विभागात दोन टप्प्यांमध्ये ८१४ कोटी रुपयांचे वाटप झाल्यानंतर करण्यात आलेल्या फेरतपासणीमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी अनुदान कमी लागणार असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. तिसऱ्या टप्प्यासाठी लातूर वगळता इतर जिल्ह्यांची सुधारित मागणी शासनाकडे करण्यात आली होती. या मागणीनुसार २८२ कोटी ५७ लाख रुपयांचा तिसरा आणि अंतिम टप्प्याच्या नुकसान भरपाईची रक्कम विभागीय प्रशासनाला प्राप्त झाली, त्यानंतर ही रक्कम त्या-त्या जिल्ह्यांना वितरित करण्यात आली होती.
खरीप २०१७ हंगामामध्ये मराठवाड्यातील एकूण ४७ लाख ७० हजार २०० हेक्टरपैकी १५ लाख ८२ हजार ६७९ हेक्टरवर कापसाचे पीक घेण्यात आले. बाधित असलेल्या २६ लाख ९० हजार ९३९ शेतकऱ्यांसाठी १२२१ कोटी चार लाख रुपये नुकसान भरपाईची आवश्यकता असल्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आल्यानंतर ही रक्कम मंजूर करण्यात आली होती.
\Bमे, जून महिन्यात मिळाले होते दोन हप्ते\B
मराठवाड्याला नऊ मे रोजी ४०७ कोटी एक लाख रुपयांच्या अनुदानाचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला. यापैकी ३२५ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम त्या-त्या जिल्ह्यांना वितरित करण्यात आली. १३ जुलै रोजी मिळालेल्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये ४०७ कोटी; तसेच पहिल्या टप्प्यातील शिल्लक ८१ कोटी असे ४८८ कोटी रुपयांचे वाटपही पूर्ण करण्यात आले होते. आता २४ ऑक्टोबरला मिळालेल्या २८२ कोटी ५७ लाख रुपयांच्या तिसऱ्या आणि अंतिम हप्त्याचे वाटपही गेल्या चाळीस दिवसांपासून सुरू आहे.
\Bजिल्हानिहाय तिसऱ्या टप्प्यातील प्राप्त रक्कम\B
जिल्हा....................रक्कम
औरंगाबाद.......८८ कोटी ५३ लाख
बीड...............८५ कोटी ५३ लाख
जालना...........९१ कोटी ७९ लाख
उस्मानाबाद.....४ कोटी ५१ लाख
हिंगोली...........१२ कोटी २० लाख
परभणी...........४६ कोटी ८५ लाख
नांदेड............४१ कोटी ९३ लाख
लातूर.................. मागणी नाही