अ‍ॅपशहर

लग्न समारंभातून २९ तोळ्यांचे दागिने चोरी

म टा प्रतिनिधी, औरंगाबादशहरातील प्रसिद्ध बिल्डर राजेंद्रसिंग जाबिंदा यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यातून २९ तोळे दागिने चोरीस गेले...

Maharashtra Times 10 Dec 2018, 5:27 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम golden-jwellery


शहरातील प्रसिद्ध बिल्डर राजेंद्रसिंग जाबिंदा यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यातून २९ तोळे दागिने चोरीस गेले. हा ऐवज सुमारे साडे नऊ लाख रुपयांचा आहे. बीड बायपासवरील जाबिंदा लॉन्स येथे घडलेल्या या चोरीप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी तीन ते साडे तीनच्या दरम्यान घडला.

शहरातील बिल्डर राजेंद्रसिंग जाबिंदा यांच्या घरी सोमवारी विवाह सोहळा होता. बीड बायपासवरील जाबिंदा लॉन्सवर या भव्य विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुलीला विवाहात देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दागिन्यांची खरेदी करण्यात आली होती. हे दागिने मुलीच्या आईच्या पर्समध्ये ठेवलेले होते. यामध्ये विविध १७ प्रकारच्या एकूण २९ तोळे दागिन्यांचा समावेश होता. त्याची किंमत सुमारे नऊ लाख ३१ हजार होती. चोरट्यांनी संधी साधून ही दागिन्यांची पर्स चोरून नेली. या प्रकरणी शनिवारी सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे तपास करीत आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांच्या हजेरीत चोराचे धाडस

जाबिंदा यांच्या विवाह समारंभासाठी शहरातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यामध्ये शहरातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चोरट्यांनी धाडसाने साडेनऊ लाखांच्या दागिन्यांची चोरी करीत पोलिसांना आव्हान दिले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज