म. टा. प्रतिनिधी, लातूर
जिल्ह्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन घोषित करावा, अशी परिस्थिती आज तरी नाही, असे लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आज लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजीत केली होती. या परिषदेमध्ये पत्रकारांनी राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये त्या, त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेवून त्या, त्या जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनबाबत काय निर्णय होणार आहे, असे विचारले असता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, 'जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागू होणार नाही.' अमित देशमुख यांनी देखील कोरोना हा लातूर जिल्ह्यामध्ये नियंत्रणात आहे. जिल्ह्यामध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे, अशीही स्थिती नाही. मात्र, हा करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होऊ नये यासाठी प्रशासन व नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा, गर्दी करू नये. सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले. करोनाबाबत घाबरण्याचे कारण नाही. यासाठी लस आली आहे.
करोना परिस्थितीत अग्रभागी असलेल्या अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर यांना लस देण्यात येत आहे. सुदैवाने लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जेवढ्यांना लस देण्यात आली आहे, त्याचे साइड इफेक्ट कोठेही नाहीत. टप्प्याटप्प्याने ही लस सर्वांना देता येईल, असे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये करोनाचे रूग्ण वाढलेच तर त्यांच्यावर उपचार करणे याबाबत सर्व यंत्रणा दक्ष आहे. लातूर जिल्ह्यामध्ये राज्याच्या इतर तुलनेत कोरोना चाचणी करण्यात लातूर जिल्हा हा सर्वांत पुढे आहे, असेही देशमुख यांनी नमूद केले.
लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सभासमारंभ, खासगी क्लासेस अशा ठिकाणची गर्दी टाळण्यासंदर्भात प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. करोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन होत आहे, अशा ठिकाणी प्रशासनाच्या वतीने नोटीसही बजावण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. प्रशासनाने करोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवाव्यात अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.
या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अॅड. दीपक सूळ यांची उपस्थिती होती.
आजच्या स्थितीत लातूर जिल्ह्यामध्ये शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणीचे वर्ग बंद ठेवावेत, अशी परिस्थिती नाही. करोनासंदर्भात प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाने 'मी जबाबदार' ही घोषणा लक्षात ठेवावी आणि दक्ष राहावे. त्यामुळे करोनाचा फैलाव होणार नाही.
- अमित देशमुख,
पालकमंत्री, लातूर
जिल्ह्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन घोषित करावा, अशी परिस्थिती आज तरी नाही, असे लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आज लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजीत केली होती. या परिषदेमध्ये पत्रकारांनी राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये त्या, त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेवून त्या, त्या जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनबाबत काय निर्णय होणार आहे, असे विचारले असता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, 'जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागू होणार नाही.' अमित देशमुख यांनी देखील कोरोना हा लातूर जिल्ह्यामध्ये नियंत्रणात आहे. जिल्ह्यामध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे, अशीही स्थिती नाही. मात्र, हा करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होऊ नये यासाठी प्रशासन व नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा, गर्दी करू नये. सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले. करोनाबाबत घाबरण्याचे कारण नाही. यासाठी लस आली आहे.
करोना परिस्थितीत अग्रभागी असलेल्या अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर यांना लस देण्यात येत आहे. सुदैवाने लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जेवढ्यांना लस देण्यात आली आहे, त्याचे साइड इफेक्ट कोठेही नाहीत. टप्प्याटप्प्याने ही लस सर्वांना देता येईल, असे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये करोनाचे रूग्ण वाढलेच तर त्यांच्यावर उपचार करणे याबाबत सर्व यंत्रणा दक्ष आहे. लातूर जिल्ह्यामध्ये राज्याच्या इतर तुलनेत कोरोना चाचणी करण्यात लातूर जिल्हा हा सर्वांत पुढे आहे, असेही देशमुख यांनी नमूद केले.
लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सभासमारंभ, खासगी क्लासेस अशा ठिकाणची गर्दी टाळण्यासंदर्भात प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. करोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन होत आहे, अशा ठिकाणी प्रशासनाच्या वतीने नोटीसही बजावण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. प्रशासनाने करोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवाव्यात अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.
या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अॅड. दीपक सूळ यांची उपस्थिती होती.
आजच्या स्थितीत लातूर जिल्ह्यामध्ये शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणीचे वर्ग बंद ठेवावेत, अशी परिस्थिती नाही. करोनासंदर्भात प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाने 'मी जबाबदार' ही घोषणा लक्षात ठेवावी आणि दक्ष राहावे. त्यामुळे करोनाचा फैलाव होणार नाही.
- अमित देशमुख,
पालकमंत्री, लातूर