म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लॉकडाऊननंतर एसटी बस सेवेला ऑगस्ट महिन्यात सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एसटीला पाच कोटी सहा लाख ९२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र करोनामुळे प्रवासी घटल्याने चार कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे.
करोनामुळे मार्चपासून एसटी महामंडळाची सेवा बंद केल्यानचे सहा महिन्यांत कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडावे लागले. अनलॉक सुरू झाल्यानंतर २० ऑगस्टपासून बस सेवेला परवानगी मिळाली. परंतु, प्रवाशांच्या मनात करोनाची दहशत कायम असल्याने औरंगाबाद विभागातून ऑगस्टचे दहा दिवस व सप्टेंबरच्या संपूर्ण महिन्यात केवळ ९४ हजार ४२९ प्रवाशांनीच विविध ठिकाणी प्रवास केला. यातून एसटी महामंडळाला एक कोटी १७ लाख ६३ हजार ३५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गत वर्षी याच महिन्यात सहा लाख सात हजार २७ प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यातून पाच कोटी सहा लाख ७२ हजार ९४५ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चार कोटींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. एसटी महामंडळाच्या वतीने सर्वच मार्गावर सेवा सुरू करण्यात आली आहे. हळुहळु प्रवासी संख्या वाढत आहे. त्यामुळे दिवाळीच्या मोसमात उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
लॉकडाऊननंतर एसटी बस सेवेला ऑगस्ट महिन्यात सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एसटीला पाच कोटी सहा लाख ९२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र करोनामुळे प्रवासी घटल्याने चार कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे.
करोनामुळे मार्चपासून एसटी महामंडळाची सेवा बंद केल्यानचे सहा महिन्यांत कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडावे लागले. अनलॉक सुरू झाल्यानंतर २० ऑगस्टपासून बस सेवेला परवानगी मिळाली. परंतु, प्रवाशांच्या मनात करोनाची दहशत कायम असल्याने औरंगाबाद विभागातून ऑगस्टचे दहा दिवस व सप्टेंबरच्या संपूर्ण महिन्यात केवळ ९४ हजार ४२९ प्रवाशांनीच विविध ठिकाणी प्रवास केला. यातून एसटी महामंडळाला एक कोटी १७ लाख ६३ हजार ३५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गत वर्षी याच महिन्यात सहा लाख सात हजार २७ प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यातून पाच कोटी सहा लाख ७२ हजार ९४५ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चार कोटींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. एसटी महामंडळाच्या वतीने सर्वच मार्गावर सेवा सुरू करण्यात आली आहे. हळुहळु प्रवासी संख्या वाढत आहे. त्यामुळे दिवाळीच्या मोसमात उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे.