अथर्व, श्रीपाद, सुधन्व भारतीय संघात
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय जिम्नॅस्टिक्स संघात औरंगाबादच्या अथर्व जोशी, श्रीपाद हराळ व सुधन्व बोर्डे या तिघांची निवड करण्यात आली आहे.
मंगोलियामध्ये १३ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी हे तिघे जिम्नॅस्ट रवाना झाले आहेत. बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत १५ ते १७ वर्षे वयोगटात अथर्व, श्रीपाद व सुधन्व यांनी तिहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. या कामगिरीमुळे या तिघांची भारतीय संघात निवड करण्यात आली. या खेळाडूंना साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात डॉ. मकरंद जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. पोदार इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचा अथर्व जोशी हा नऊ वर्षांपासून आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत आहे. त्याने राज्य स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात रौप्य व एरोबिक्स प्रकाकार सुवर्णपदक जिंकले आहे. त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.
शांतीनिकेतन हायस्कूलच्या श्रीपाद हराळची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर तो नऊ वर्षांपासून जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत आहे. मागील चार वर्षांमध्ये त्याने राज्य आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये रौप्य व ब्राँझपदके जिंकण्याबरोबरच एरोबिक प्रकारातही राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. एसबीओए स्कूलचा खेळाडू सुधन्व बोर्डे हा सात वर्षांपासून जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत आहे. गेल्या चार वर्षांपासून त्याने राज्य एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सुवर्णपदक व रौप्यपदके जिंकलेली आहेत. त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.
भारतीय जिम्नॅस्टिक्स संघात १६ खेळाडूंचा समावेश आहे. त्यात सेनादल, हरियाणा, महाराष्ट्र, मणिपूर, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यातील खेळाडूंचा समावेश आहे. प्रशिक्षक म्हणून वाय. रंजन, सुनील छेत्री, नील कमल, डॉ. मकरंद जोशी हे संघासमवेत जाणार आहेत. मकरंद जोशी यांनी आतापर्यंत पाच जागतिक एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आहे. तसेच अनेक आशियाई व जागतिक सिरीज स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय जिम्नॅस्टिक्स महासंघाचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी, सचिव रणजित वसावा, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, पवन भोईर, आदित्य जोशी, संकर्षण जोशी, सागर कुलकर्णी, रामकृष्ण लोखंडे, तनुजा गाढवे, अजितसिंग राठोड यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय जिम्नॅस्टिक्स संघात औरंगाबादच्या अथर्व जोशी, श्रीपाद हराळ व सुधन्व बोर्डे या तिघांची निवड करण्यात आली आहे.
मंगोलियामध्ये १३ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी हे तिघे जिम्नॅस्ट रवाना झाले आहेत. बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत १५ ते १७ वर्षे वयोगटात अथर्व, श्रीपाद व सुधन्व यांनी तिहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. या कामगिरीमुळे या तिघांची भारतीय संघात निवड करण्यात आली. या खेळाडूंना साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात डॉ. मकरंद जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. पोदार इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचा अथर्व जोशी हा नऊ वर्षांपासून आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत आहे. त्याने राज्य स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात रौप्य व एरोबिक्स प्रकाकार सुवर्णपदक जिंकले आहे. त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.
शांतीनिकेतन हायस्कूलच्या श्रीपाद हराळची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर तो नऊ वर्षांपासून जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत आहे. मागील चार वर्षांमध्ये त्याने राज्य आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये रौप्य व ब्राँझपदके जिंकण्याबरोबरच एरोबिक प्रकारातही राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. एसबीओए स्कूलचा खेळाडू सुधन्व बोर्डे हा सात वर्षांपासून जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत आहे. गेल्या चार वर्षांपासून त्याने राज्य एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सुवर्णपदक व रौप्यपदके जिंकलेली आहेत. त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.
भारतीय जिम्नॅस्टिक्स संघात १६ खेळाडूंचा समावेश आहे. त्यात सेनादल, हरियाणा, महाराष्ट्र, मणिपूर, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यातील खेळाडूंचा समावेश आहे. प्रशिक्षक म्हणून वाय. रंजन, सुनील छेत्री, नील कमल, डॉ. मकरंद जोशी हे संघासमवेत जाणार आहेत. मकरंद जोशी यांनी आतापर्यंत पाच जागतिक एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आहे. तसेच अनेक आशियाई व जागतिक सिरीज स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय जिम्नॅस्टिक्स महासंघाचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी, सचिव रणजित वसावा, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, पवन भोईर, आदित्य जोशी, संकर्षण जोशी, सागर कुलकर्णी, रामकृष्ण लोखंडे, तनुजा गाढवे, अजितसिंग राठोड यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.