अ‍ॅपशहर

'भाजप असेपर्यंत अच्छे दिन येणार नाहीत'

'राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारची ३ वर्षे फक्त घोषणाबाजीची होती. सर्वच पातळ्यांवर हे सरकार अपयशी ठरलं असून हे सरकार पायउतार होत नाही तोवर सर्वसामान्यांना 'अच्छे दिन' येणार नाहीत,' अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज केली.

Maharashtra Times 31 Oct 2017, 1:26 pm
मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three years of fadnavis govt ashok chavan lashes sena bjp
'भाजप असेपर्यंत अच्छे दिन येणार नाहीत'


'राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारची ३ वर्षे फक्त घोषणाबाजीची होती. सर्वच पातळ्यांवर हे सरकार अपयशी ठरलं असून हे सरकार पायउतार होत नाही तोवर सर्वसामान्यांना 'अच्छे दिन' येणार नाहीत,' अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज केली.

युती सरकारनं तीन वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्तानं अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी फडणवीस सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला. भाजप-शिवसेनेतील कुरबुरींवरही त्यांनी भाष्य केलं. 'शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटच्या बैठकीत गप्प राहतात आणि बाहेर आले की सरकारच्या विरोधात बोलतात. त्यामुळं शिवसेनेवर लोकांचा विश्वासच राहिलेला नाही,' असा टोला चव्हाण यांनी हाणला. केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया'चा फज्जा उडाला आहे. हे 'मेक इन' नव्हे 'फेक इन इंडिया' झालं आहे. महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक इतर राज्यांत गेली आहे,' असंही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज