अ‍ॅपशहर

औरंगाबादः गल्लीतल्या भांडणातून तिघांची निर्घृण हत्या

गल्लीत झालेल्या किरकोळ भांडणावरून संतापलेल्या एका तरुणाने शेजारच्या तीन लोकांचा निर्घृणपणे खून केला. औरंगाबादेतील चिखलठाणा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि एका मुलाचा समावेश आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Sep 2019, 10:25 pm
औरंगाबादः गल्लीत झालेल्या किरकोळ भांडणावरून संतापलेल्या एका तरुणाने शेजारच्या तीन लोकांचा निर्घृणपणे खून केला. औरंगाबादेतील चिखलठाणा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि एका मुलाचा समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police


अमोल बोर्डे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या घराशेजारी राहणाऱ्या बोराडे कुटुंबाचा आणि अमोल बोर्डेचा क्षुल्लक कारणावरून गल्लीत वाद झाला. वादाचे रुपांतर शिवीगाळ आणि भांडणात झाले. माथेफिरू अमोल बोर्डे याने रागाच्या भरात घरी जाऊन चाकू आणला व बोराडेच्या घरात प्रवेश करीत दिनकर बोराडे, कमलबाई दिनकर बोराडे आणि भगवान बोराडे या तिघांवर चाकूने सपासप वार केले. तिघांवर चाकूने हल्ला केल्याने हे तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. किरकोळ भांडणावरून तिघांचा खून करण्यात आल्याची माहिती पसरताच या परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. अमोल बोर्डेने रागाच्या भरातून हे कृत्य केले आहे की आणखी यामागे अन्य कारण आहे, याचा तपास पोलीस घेत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज