औरंगाबाद : औरंगाबाद ते हैदराबाददरम्यानची ट्रू जेट कंपनीची हवाई वाहतूक सेवा पाच सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. तांत्रिक कारणामुळे ट्रू जेटचे विमान २६ ऑगस्टपासून रद्द करण्यात आले आहे. एक सप्टेंबरपासून ट्रू जेट विमान पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात होती, मात्र एक सप्टेंबरपासून पाच सप्टेंबरपर्यंत ट्रू जेट विमान सेवा रद्द असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी ट्रू जेट कंपनीने हैदराबाद ते शिर्डी हे विमान सुरू केले आहे. त्यामुळे औरंगाबादला विमान नसल्याने हे विमान रद्द करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ही विमान सेवा सुरू राहिल किंवा नाही, याबाबत शंका उपस्थितीत केली जात आहे.
पाच सप्टेंबरपर्यंत ट्रू जेटचे विमान रद्द
औरंगाबाद ते हैदराबाददरम्यानची ट्रू जेट कंपनीची हवाई वाहतूक सेवा पाच सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे...
Maharashtra Times 3 Sep 2018, 4:00 am