म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराचा विकास साधण्यासाठी कुठेही राजकीय अभिनिवेश ठेवता कामा नये. औरंगाबादमधील कचराकोंडी दूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यापुढे भावनात्मक फसवणे बंद करून विकासावर भर दिला पाहिजे, असा टोला भाजप आमदार प्रशांत बंब यांनी लगाविला.
राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी काय दिले आहे याची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, राम बुधवंत यांची उपस्थिती होती. आमदार बंब म्हणाले, कचराकोंडीचा प्रश्न आता उद्भवलेला नाही. २० वर्षांपासूनच त्याचे नियोजन केलेले नाही. कचरा निर्मूलनासाठी कायमस्वरुपी उपाययोजना केल्या पाहिजे. भावनात्मक किती दिवस फसवत राहणार, कचराकोंडी दूर होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागेल. पूर्ण कचरा निर्मूलन करण्यासाठी छोटे प्लँट टाकून कार्यान्वित होण्यासाठी आठ ते दहा महिने लागतील. त्यानंतर हा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल. वास्तविक हे नियोजन पूर्वीच होणे आवश्यक होते, असे आमदार बंब म्हणाले.
\B'पिंजळ'च्या माध्यमातून ५० टीएमसी पाणी
\B
राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी पुरेशी तरतूद केल्याचा दावा आमदार बंब यांनी केला. ते म्हणाले, की पर्यटन विकासासाठी तरतूद केली आहे. गोदावरी खोऱ्यात ५० टीएमसी पाणी 'पिंजळ'च्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचा फायदा आपल्याला करून घ्यावा लागेल. सरसकट सर्व शेतकऱ्यांना दोन रुपये किलोने गहू व तीन रुपये किलोने तांदूळ दिला जाणार आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी तरतूद केली आहे. एकूणच यंदाच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी बऱ्यापैकी तरतूद केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहराचा विकास साधण्यासाठी कुठेही राजकीय अभिनिवेश ठेवता कामा नये. औरंगाबादमधील कचराकोंडी दूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यापुढे भावनात्मक फसवणे बंद करून विकासावर भर दिला पाहिजे, असा टोला भाजप आमदार प्रशांत बंब यांनी लगाविला.
राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी काय दिले आहे याची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, राम बुधवंत यांची उपस्थिती होती. आमदार बंब म्हणाले, कचराकोंडीचा प्रश्न आता उद्भवलेला नाही. २० वर्षांपासूनच त्याचे नियोजन केलेले नाही. कचरा निर्मूलनासाठी कायमस्वरुपी उपाययोजना केल्या पाहिजे. भावनात्मक किती दिवस फसवत राहणार, कचराकोंडी दूर होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागेल. पूर्ण कचरा निर्मूलन करण्यासाठी छोटे प्लँट टाकून कार्यान्वित होण्यासाठी आठ ते दहा महिने लागतील. त्यानंतर हा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल. वास्तविक हे नियोजन पूर्वीच होणे आवश्यक होते, असे आमदार बंब म्हणाले.
\B'पिंजळ'च्या माध्यमातून ५० टीएमसी पाणी
\B
राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी पुरेशी तरतूद केल्याचा दावा आमदार बंब यांनी केला. ते म्हणाले, की पर्यटन विकासासाठी तरतूद केली आहे. गोदावरी खोऱ्यात ५० टीएमसी पाणी 'पिंजळ'च्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचा फायदा आपल्याला करून घ्यावा लागेल. सरसकट सर्व शेतकऱ्यांना दोन रुपये किलोने गहू व तीन रुपये किलोने तांदूळ दिला जाणार आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी तरतूद केली आहे. एकूणच यंदाच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी बऱ्यापैकी तरतूद केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.