अ‍ॅपशहर

धक्कादायक! लटकलेल्या विजेच्या तारांचा बैलांच्या शिंगाला स्पर्श, यानंतर जे घडलं ते धक्कादायकच...

विजेच्या धक्क्याने औरंगाबादमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. लटकलेल्या तारांमुळे ही भीषण घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jul 2022, 9:38 am
औरंगाबाद : विजेच्या धक्क्याने कन्नड तालुक्यातील नावाडी इथे चौघांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच वैजापूर तालुक्यातील बायगाव वस्तीमध्ये पुन्हा असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये दोन बैलांसह दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad news today


मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील बोअरच्या कामासाठी टाकलेल्या विजेच्या तारांचे स्पर्श बैलगाडीला झाला आणि वीजप्रवाह गाडीत उतरुन एकाला धक्का बसला. त्याला वाचविण्यासाठी आलेल्या भावाला देखील विजेचा धक्का बसल्याने बैलासह दोन सख्ख्या भावांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. साहेबराव गणपत पाटील चेळेकर वय-७० व त्यांचे लहान बंधू बाबुराव गणपत पाटील चेळेकर वय-५७ वर्ष (रा.बायगाव वस्ती, तालुका वैजापूर) अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही भावांची नावे आहेत.

सियाचीनमधील जवानांना श्वास घेणे सुकर व्हावे यासाठी झटणारे योगेश चिथडे यांचे निधन
मिळालेल्या माहितीनुसार, वैजापुर तालुक्यातील बायगाव इथल्या चेळेकर वस्तीवर राहणारे साहेबराव गणपत चेळेकर हे बुधवारी संध्याकाळी पाऊस पडून गेल्याने शेतातील कामे उरकून जुना बायगाव - देवगाव रंगारी गाडीवाटेने लोखंडी बैलगाडी हाकत घराकडे येत होते. त्याच रस्त्यावर दुसऱ्या एका शेतकऱ्याचे विनापोल बोअरवेलसाठी गेलेले आणि रस्त्यावर लटकलेले वीजवाहक केबल आणि सर्व्हिस वायर बैलांच्या शिंगात अडकले. यामुळे वीज प्रवाहाच धक्का बसून तो बैल जागीच ठार झाला.

या घटनेनंतर शिऊरचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह उपनिरीक्षक ए.जे. नागटिळक, पोलीस कर्मचारी जाधव, पवार यांनी देवगाव रंगारी ग्रामीण रुग्णालयात येऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद शिऊर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. दरम्यान, साहेबराव चेळेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातू, पणतू तर बाबुराव चेळेकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज