अ‍ॅपशहर

दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा

म टा प्रतिनिधी, औरंगाबादमराठवाड्यातील काही भागांमध्ये २७ व २८ जून रोजी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे...

Maharashtra Times 26 Jun 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील काही भागांमध्ये २७ व २८ जून रोजी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. औरंगाबाद शहरात २५ ते २९ जून हे पाचही दिवशी ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांमध्ये मराठवाड्यात आकाश ढगाळ राहून वाऱ्याचा वेग अधिक राहील तसेच औरंगाबाद, हिंगोली, लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मध्यम ते भारी तर बीड, जालना व परभणी जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच पाऊस राहील. ११ जून रोजी मराठवाड्यातील २४ मंडळात अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाने १२ जून ते २० जून दरम्यान दांडी मारली होती. दोन दिवसांपासून पावसाने पुनरागमन केले आहे. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्याच्या तुलनेत विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज