अ‍ॅपशहर

Bhagwat Karad: अन् केंद्रीय मंत्री भागवत कराड पोहचले 'त्या' उड्डाणपूलावर

Bhagwat Karad: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या क्रांतीचौक उड्डाणपुलावर भेट दिली. या पुलावर सहा इंचांपेक्षा मोठा गॅप पडला असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत होते.

Authored byम. टा. प्रतिनिधी | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 7 Jan 2022, 8:13 am
औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या क्रांतीचौक उड्डाणपुलावर भेट दिली. या पुलावर सहा इंचांपेक्षा मोठा गॅप पडला असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत होते. पण यासाठी कोणतेही यंत्रणा पुढे येत नसल्याने गुरुवारी कराड यांनी स्वतः पुलावर जाऊन आढावा घेतला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Union Minister Bhagwat karad Visit Aurangabad Kranti Chowk Flyover


शहरातील महत्वाचं ठिकाण म्हणून क्रांती चौकाची ओळख आहे. रोज या उड्डाणपूलावरून अंदाजे १३ ते १४ हजार वाहनांचं येणंजाणं असतं. मात्र १० वर्षांपूर्वी बांधलेल्या हा उड्डाणपूलाला अचानक अंदाजे सहा फुटांची भेग पडली आहे. त्यामुळे पुलाचे बेअरिंग अलायमेंट सरकले की, काय, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत होते. पण सर्वच विभागाचे अधिकारी हात वर करत असल्याने नेमका प्रकार काय आहे हे कळायला मार्ग नव्हता.

त्यामुळे आज भागवत कराड यांनी एनएचएआय, मनपा, एमएसआरडीसीच्या अभियंत्यांना सोबत घेत उड्डाणपूलाची पाहणी केली. पुलातील रबर सरकल्याने फट दिसत असल्याचे अभियंत्यांकडून यावेळी सांगण्यात आले. तर याबाबत एक बैठक बोलावून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना सुद्धा यावेळी कराड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

परंतु, स्थापत्य तंत्रानुसार ती फट काही ठिकाणी जास्त, तर काही ठिकाणी कमी आहे. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे, हे आता स्ट्रक्चरल ऑडिटनंतरच समोर येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज