औरंगाबाद : दलितांची मतं लागतात पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाही. मुस्लिमांची मत लागतात पण मुस्लिमांचा पक्ष लागत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही पूर्वीपासूनची मानसिकता आहे. पुरोगामी हा शब्द केवळ राजकारणासाठी दोन्ही पक्ष वापरतात, अशी जळजळीत टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. महाविकास आघाडीने एमआयएमला टाळी देण्यास नकार दिल्यानंतर दानवेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
"काँग्रेस आणि राष्ट्रवादी राजकारणासाठी दलित आणि मुस्लिम समाजाचा वापर करुन घेत आले आहेत. दोन्ही पक्षांना दलित मतं लागतात पण आंबेडकर चालत नाही, तसंच मुस्लिम मतं लागतात पण मुस्लिम पक्ष चालत नाही", असं सांगताना दानवे उदाहरण द्यायला देखील विसरले नाहीत. लोकसभेला दोन्ही वेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने उमेदवार उभा केला. त्यामुळे दोन्ही पक्षांची मानसिकता आम्ही फार पूर्वीपासून ओळखून आहोत, असं दानवे म्हणाले.
MIM भाजपची बी टीम होऊच शकत नाही
"एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा वारंवार आरोप करण्यात येतो. पण आरोप करणाऱ्यांना मी दाव्याने सांगू शकतो, एमआयएम ही भाजपची टीम होऊच शकत नाही. कारण आमचा एक नंबरचा शत्रू काँग्रेस आहे, दोन नंबरचा शत्रू एमआयएम आहे आणि तीन नंबरचा शत्रू कम्युनिस्ट पक्ष आहे", असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिलं.
"दुसरीकडे एमआयएमने राष्ट्रवादीला दिलेली ऑफर म्हणजे राष्ट्रवादीनेच केलेली खेळी आहे. त्यांना जनतेचा अंदाज घ्यायचा आहे. राष्ट्रवादीने ही गुलली टाकलेली आहे. पण ऑफरनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस झटक्यात बाजूला गेल्या. शिवसेना फोकसमध्ये आहे. आता चर्चा सुरु झालीय, शिवसेना तर एमआयएम सोबत जाणार नाही ना...! कारण शिवसेनेने आतापर्यंत तेच केलंय, ज्यावर ते जाहीररित्या बोलले नााहीत", असा टोला दानवेंनी लगावला.
"काँग्रेस आणि राष्ट्रवादी राजकारणासाठी दलित आणि मुस्लिम समाजाचा वापर करुन घेत आले आहेत. दोन्ही पक्षांना दलित मतं लागतात पण आंबेडकर चालत नाही, तसंच मुस्लिम मतं लागतात पण मुस्लिम पक्ष चालत नाही", असं सांगताना दानवे उदाहरण द्यायला देखील विसरले नाहीत. लोकसभेला दोन्ही वेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने उमेदवार उभा केला. त्यामुळे दोन्ही पक्षांची मानसिकता आम्ही फार पूर्वीपासून ओळखून आहोत, असं दानवे म्हणाले.
MIM भाजपची बी टीम होऊच शकत नाही
"एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा वारंवार आरोप करण्यात येतो. पण आरोप करणाऱ्यांना मी दाव्याने सांगू शकतो, एमआयएम ही भाजपची टीम होऊच शकत नाही. कारण आमचा एक नंबरचा शत्रू काँग्रेस आहे, दोन नंबरचा शत्रू एमआयएम आहे आणि तीन नंबरचा शत्रू कम्युनिस्ट पक्ष आहे", असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिलं.
"दुसरीकडे एमआयएमने राष्ट्रवादीला दिलेली ऑफर म्हणजे राष्ट्रवादीनेच केलेली खेळी आहे. त्यांना जनतेचा अंदाज घ्यायचा आहे. राष्ट्रवादीने ही गुलली टाकलेली आहे. पण ऑफरनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस झटक्यात बाजूला गेल्या. शिवसेना फोकसमध्ये आहे. आता चर्चा सुरु झालीय, शिवसेना तर एमआयएम सोबत जाणार नाही ना...! कारण शिवसेनेने आतापर्यंत तेच केलंय, ज्यावर ते जाहीररित्या बोलले नााहीत", असा टोला दानवेंनी लगावला.