म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आगामी महापालिका निवडणूक स्वबळावरच लढणविण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला असून सर्वच्या सर्व जागा लढणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते, निवडणूक निरीक्षक फारूक अहमद यांनी दिली. शिवसेनेसोबत सत्तेत भागीदारी करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे कसले पुरोगामी असा सवालही त्यांनी केला. औरंगाबाद नामांतरचा मुद्दा हा केवळ निवडणूकीपुरता शिवसेनेकडून दरवेळेस काढत राजकीय खेळी खेळली जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यास खरेच विरोध असेल तर, ते सत्तेबाहेर का पडत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
पक्षीय कामानिमित्ताने ते बुधवारी शहरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, धम्मनंद सोनटक्के, योगेश बन, प्रभाकर बकले, पंकज बनसोडे, किरण बनकर, कृष्णा बनकर, अब्दुल समद आदी उपस्थित होते.
प्रारंभी पक्षनेत्याच्या उपस्थितीत माजी विरोधी पक्षनेते मिलिंद दाभाडे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. दाभाडे यांच्यासह त्यांचे असंख्य समर्थक कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याचे यावेळी अहमल यांनी त्यांचे स्वागत केले.
पत्रकारांशी संवाद साधताना अहमद यांनी, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेवर तोफ डागली. निवडणुका आल्या की, शिवसेना नेहमीप्रमाणे औरंगाबाद नामांतराचा मुद्दा काढून भावनिक राजकारण करु पाहाते. गेल्या अनेक वर्षापासून ते येथे सत्तेत आहेत, पण आजही नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. रस्तेसह अन्य नागरी प्रश्न आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, शहराचा विकास व्हावा, हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत वंचित बहुजन आघाडी निवडणूक रिंगणात उतरणार आहे. स्वबळावर सर्वच्या सर्व जागा लढणार असून जनसेवेचे व्रत घेतलेले सक्षम उमेदवार असतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहराचे नामांतर करुनच दाखवावे, असे आव्हानही अहमद यांनी यावेळी दिले. पुण्याचे नाव बदलून संभाजीनगर करा, या मागणीवर आघाडी ठाम असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
उमेदवारांची चाचपणी :
शहराच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडी कटीबद्ध असून लोकांच्या सेवेसाठी धावून जाणारा, नागरी प्रश्नासाठी तळमळ असणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि लोकशिक्षण झालेले सक्षम उमेदवार दिले जातील, त्यासाठी चाचपणी सुरु असून योग्यवेळी निर्णय घेऊ असे पक्षनेत्यांनी यावेळी नमूद केले.
आगामी महापालिका निवडणूक स्वबळावरच लढणविण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला असून सर्वच्या सर्व जागा लढणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते, निवडणूक निरीक्षक फारूक अहमद यांनी दिली. शिवसेनेसोबत सत्तेत भागीदारी करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे कसले पुरोगामी असा सवालही त्यांनी केला. औरंगाबाद नामांतरचा मुद्दा हा केवळ निवडणूकीपुरता शिवसेनेकडून दरवेळेस काढत राजकीय खेळी खेळली जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यास खरेच विरोध असेल तर, ते सत्तेबाहेर का पडत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
पक्षीय कामानिमित्ताने ते बुधवारी शहरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, धम्मनंद सोनटक्के, योगेश बन, प्रभाकर बकले, पंकज बनसोडे, किरण बनकर, कृष्णा बनकर, अब्दुल समद आदी उपस्थित होते.
प्रारंभी पक्षनेत्याच्या उपस्थितीत माजी विरोधी पक्षनेते मिलिंद दाभाडे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. दाभाडे यांच्यासह त्यांचे असंख्य समर्थक कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याचे यावेळी अहमल यांनी त्यांचे स्वागत केले.
पत्रकारांशी संवाद साधताना अहमद यांनी, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेवर तोफ डागली. निवडणुका आल्या की, शिवसेना नेहमीप्रमाणे औरंगाबाद नामांतराचा मुद्दा काढून भावनिक राजकारण करु पाहाते. गेल्या अनेक वर्षापासून ते येथे सत्तेत आहेत, पण आजही नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. रस्तेसह अन्य नागरी प्रश्न आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, शहराचा विकास व्हावा, हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत वंचित बहुजन आघाडी निवडणूक रिंगणात उतरणार आहे. स्वबळावर सर्वच्या सर्व जागा लढणार असून जनसेवेचे व्रत घेतलेले सक्षम उमेदवार असतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहराचे नामांतर करुनच दाखवावे, असे आव्हानही अहमद यांनी यावेळी दिले. पुण्याचे नाव बदलून संभाजीनगर करा, या मागणीवर आघाडी ठाम असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
उमेदवारांची चाचपणी :
शहराच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडी कटीबद्ध असून लोकांच्या सेवेसाठी धावून जाणारा, नागरी प्रश्नासाठी तळमळ असणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि लोकशिक्षण झालेले सक्षम उमेदवार दिले जातील, त्यासाठी चाचपणी सुरु असून योग्यवेळी निर्णय घेऊ असे पक्षनेत्यांनी यावेळी नमूद केले.