सिंगल बातमी
औरंगाबाद : माथाडी कायद्याच्या मसुद्यावर राष्ट्रपतींनी ५ जून १९६९ रोजी स्वाक्षरी केली होती, या कायद्याला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ५ जूनपासून राज्यभर विविध उपक्रम करण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाने घेतला आहे. औरंगाबाद येथे वयोवृद्ध माथाडी कामगार कामगारांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस देविदास कीर्तीशाही यांनी दिली.
औरंगाबाद येथे ५ जून रोजी जाधववाडी येथील शेतकरी भवन, कृषीउत्पन्न बाजार समिती येथे होणाऱ्या कार्यक्रमात माथाडी कायद्याचे महत्व व ज्येष्ठ माथाडी कामगारांचा सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य हमाल महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे याांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमासाठी कामगार उपायुक्त व माथाडी मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र पोळ, उच्चतम कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, आडत व्यापारी असोसिएशनचे हरीश पवार, किराणा व्यापारी असोसिएशनचे संजय कांकरीया तसेच अॅड. प्रकाश परांजपे, अॅड. मनोहर टाकसाळ, सुधीर देशमुख आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील माथाडी कामगारांनी म़ोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देविदास किर्तीशाही, छगन गवळी, प्रवीण सरकटे, अलीखान, अरविंद बोरकर, जगन भोजणे आदींनी केले आहे.