म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कविता विरंगुळ्यासाठी लिहिली जात नाही. कविता एक अपरिहार्य सामाजिक व सांस्कृतिक हस्तक्षेप असतो. साहित्य विश्वासार्हता गमावत असताना कवितेने सामाजिक उत्कर्षाची भूमिका पार पाडावी,’ असे प्रतिपादन कवी विनायक येवले यांनी केले. ‘साक्षात साहित्य पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
लेखक-पत्रकार रमेश राऊत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘साक्षात साहित्य पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, प्रसिद्ध कथाकार डॉ. आसाराम लोमटे, कवी विनायक येवले, अनिता देशपांडे आणि ‘साक्षात प्रकाशन’च्या माधुरी राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरून’ या कवितासंग्रहासाठी पुरस्कार स्वीकारल्यानंतर येवले यांनी कविता लेखनाचा प्रवास उलगडला. ‘कविता मला शोषित-अभावग्रस्तांच्या दारात घेऊन गेली. कवितेचे बोट धरून आत्मशोध घेणारा माझ्यातील माणूस प्रगल्भ झाला. सध्या कवींना जातीय अस्मिता जवळची वाटत असल्याने साहित्याची विश्वासार्हता संपत आहे. कवीने आत्मकोशात न राहता सामाजिक उत्कर्षाची भूमिका पार पाडावी’ असे येवले म्हणाले.
काव्य लेखनाचे महत्त्व डॉ. लोमटे यांनी भाषणात मांडले. ‘अक्षर सुधारण्यासाठी कुणी लिहित नसतं. आपण जगतो त्या काळाचा तुकडा कसा वाटला याचे आकलन साहित्यात असते. इतर साहित्य प्रकारापेक्षा कवितेतून काळाची मांडणी जोरकस होते. गावाचे रम्य वातावरण आणि गावाचे उध्ववस्तीकरण अशा पेचात कविता अडकली आहे. येवले यांची कविता हा पेच ओलांडून पुढे जाते. आजच्या कृषी जीवनातील प्रक्षोभाला सामोरी जाते. आता वाचकाला अस्वस्थ करणारे स्वास्थ्यहारक लिहिण्याची गरज आहे,’ असे लोमटे म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नागेश अंकुश यांनी केले, तर रेणू राऊत यांनी आभार मानले. यावेळी साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गांभिर्याने पहा
‘साहित्याकडे गांभिर्याने पाहण्याची वृत्ती कमी झाली आहे. पुस्तकाला किती पुरस्कार मिळाले यातच लेखक मग्न असतात. मात्र, लेखकाला किती पुरस्कार मिळाले यापेक्षा किती वाचक लाभले यावर साहित्यिक म्हणून भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे साहित्याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे,’ असे रा. रं. बोराडे म्हणाले.
‘कविता विरंगुळ्यासाठी लिहिली जात नाही. कविता एक अपरिहार्य सामाजिक व सांस्कृतिक हस्तक्षेप असतो. साहित्य विश्वासार्हता गमावत असताना कवितेने सामाजिक उत्कर्षाची भूमिका पार पाडावी,’ असे प्रतिपादन कवी विनायक येवले यांनी केले. ‘साक्षात साहित्य पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
लेखक-पत्रकार रमेश राऊत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘साक्षात साहित्य पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, प्रसिद्ध कथाकार डॉ. आसाराम लोमटे, कवी विनायक येवले, अनिता देशपांडे आणि ‘साक्षात प्रकाशन’च्या माधुरी राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरून’ या कवितासंग्रहासाठी पुरस्कार स्वीकारल्यानंतर येवले यांनी कविता लेखनाचा प्रवास उलगडला. ‘कविता मला शोषित-अभावग्रस्तांच्या दारात घेऊन गेली. कवितेचे बोट धरून आत्मशोध घेणारा माझ्यातील माणूस प्रगल्भ झाला. सध्या कवींना जातीय अस्मिता जवळची वाटत असल्याने साहित्याची विश्वासार्हता संपत आहे. कवीने आत्मकोशात न राहता सामाजिक उत्कर्षाची भूमिका पार पाडावी’ असे येवले म्हणाले.
काव्य लेखनाचे महत्त्व डॉ. लोमटे यांनी भाषणात मांडले. ‘अक्षर सुधारण्यासाठी कुणी लिहित नसतं. आपण जगतो त्या काळाचा तुकडा कसा वाटला याचे आकलन साहित्यात असते. इतर साहित्य प्रकारापेक्षा कवितेतून काळाची मांडणी जोरकस होते. गावाचे रम्य वातावरण आणि गावाचे उध्ववस्तीकरण अशा पेचात कविता अडकली आहे. येवले यांची कविता हा पेच ओलांडून पुढे जाते. आजच्या कृषी जीवनातील प्रक्षोभाला सामोरी जाते. आता वाचकाला अस्वस्थ करणारे स्वास्थ्यहारक लिहिण्याची गरज आहे,’ असे लोमटे म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नागेश अंकुश यांनी केले, तर रेणू राऊत यांनी आभार मानले. यावेळी साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गांभिर्याने पहा
‘साहित्याकडे गांभिर्याने पाहण्याची वृत्ती कमी झाली आहे. पुस्तकाला किती पुरस्कार मिळाले यातच लेखक मग्न असतात. मात्र, लेखकाला किती पुरस्कार मिळाले यापेक्षा किती वाचक लाभले यावर साहित्यिक म्हणून भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे साहित्याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे,’ असे रा. रं. बोराडे म्हणाले.