म. टा. प्रतिनिधी, लातूर
राज्यघटनेमध्ये कोणत्याही आधारावर भेदभाव केला गेला नाही. मात्र, सामाजिक मानसिकता ही वर्षानुवर्षांच्या परंपरांच्या अनुषंगाने असल्याने महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे. यासाठी महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात असलेली मानसिकता बदलली, तर अत्याचाराचे प्रमाण कमी होऊ शकते, असे मत जिल्हा कायदेविषयक सेवा समितीच्या सचिव एस. डी. कंकनवाडी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय महिला आयोग आणि लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित कायदेविषयक जाणीव जागृती राष्ट्रीय कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी. आर. देशमुख, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांची उपस्थिती होती.
घटनेतील वेगवेगळे कायदे आणि कायद्यातील तरतुदीसंदर्भात एस. डी. कंकनवाडी यांनी सविस्तर माहिती दिली. राजर्षी शाहू महाविद्यालयात लवकरच कायदे विषयक सल्ला केंद्र सुरु करण्यात यावे, त्यासाठी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. शिवाय महाविद्यालयाने विकासासाठी दत्तक घेतलेल्या औसा तालुक्यातील वाघोली गावातील अत्याचाराविषयक प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्व मदत देण्याची त्यांनी तयारी दर्शविली. देशातील कायदे सक्षम आहेत. मात्र कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सक्षमपणे काम करत नसल्याची खंत डॉ. गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केली.
डॉ. प्रिती पोहेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी महाविद्यालयाचा परिचय करून दिला. डॉ. अनुजा जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. प्रा. सी. डी. बनसोडे यांनी आभार मानले.
राज्यघटनेमध्ये कोणत्याही आधारावर भेदभाव केला गेला नाही. मात्र, सामाजिक मानसिकता ही वर्षानुवर्षांच्या परंपरांच्या अनुषंगाने असल्याने महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे. यासाठी महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात असलेली मानसिकता बदलली, तर अत्याचाराचे प्रमाण कमी होऊ शकते, असे मत जिल्हा कायदेविषयक सेवा समितीच्या सचिव एस. डी. कंकनवाडी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय महिला आयोग आणि लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित कायदेविषयक जाणीव जागृती राष्ट्रीय कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी. आर. देशमुख, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांची उपस्थिती होती.
घटनेतील वेगवेगळे कायदे आणि कायद्यातील तरतुदीसंदर्भात एस. डी. कंकनवाडी यांनी सविस्तर माहिती दिली. राजर्षी शाहू महाविद्यालयात लवकरच कायदे विषयक सल्ला केंद्र सुरु करण्यात यावे, त्यासाठी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. शिवाय महाविद्यालयाने विकासासाठी दत्तक घेतलेल्या औसा तालुक्यातील वाघोली गावातील अत्याचाराविषयक प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्व मदत देण्याची त्यांनी तयारी दर्शविली. देशातील कायदे सक्षम आहेत. मात्र कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सक्षमपणे काम करत नसल्याची खंत डॉ. गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केली.
डॉ. प्रिती पोहेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी महाविद्यालयाचा परिचय करून दिला. डॉ. अनुजा जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. प्रा. सी. डी. बनसोडे यांनी आभार मानले.