अ‍ॅपशहर

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा

म टा प्रतिनिधी, औरंगाबादमराठवाड्यात सगळीकडे भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे...

Maharashtra Times 14 Oct 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात सगळीकडे भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. शैक्षणिक, परीक्षा शुल्क भरण्यासाठी पैसेच नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना यावर्षी परीक्षेवर पाणी सोडावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना आमदार चव्हाण यांनी दिलेल्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेणारे बहुतांशी विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. दुष्काळाच्या झळांमुळे त्यांना गावाकडून मिळणारी आर्थिक मदत बंद झाल्यामुळे या विद्यार्थ्यांपुढे शिक्षण कसे घ्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पदवीचे ८० हजार, तर पदव्युत्तरचे ३५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत जवळपास तीन लाख सात हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच मराठवाड्यात दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्यांमध्ये देखील सर्वाधिक विद्यार्थी ग्रामीण भागातीलच आहे. परीक्षा जवळ आल्याने शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक व परीक्षा शुल्कासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शकडो विद्यार्थी शिक्षण सोडण्याच्या मन:स्थितीत आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता किमान त्यांची परीक्षा शुल्क माफ करावी,' अशी मागणी करण्यात आली आहे.

………………

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज