अ‍ॅपशहर

​ ‘नामका’तून सोडणार पाणी

वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्यातून गुरुवारी पाणी सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन २१ दिवस सुरु राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

Maharashtra Times 14 Dec 2017, 3:57 am
वैजापूरः वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्यातून गुरुवारी पाणी सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन २१ दिवस सुरु राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra/aurangabad/water
​ ‘नामका’तून सोडणार पाणी


रब्बी हंगामासाठी वैजापूर व गंगापूर या दोन तालुक्यांतील सहा हजार हेक्टर क्षेत्राला या आवर्तनातून सिंचनाचा लाभ होणार आहे. रब्बी हंगामासाठी जलदगती कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकित झाला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी कालव्यातून पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कालवा विभागाचे उपकार्यकारी अधिकारी ए. व्ही. उदावंत यांनी दिली. सकाळी सहाशे क्युसेक या विसर्गाने कालव्यातून पाणी सोडण्यात येईल. हे पाणी शनिवारी सकाळी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत दाखल होण्याची शक्यता आहे. पायथा ते माथा नियमानुसार आदी गंगापूर तालुक्याला कालव्याचे पाणी सोडण्यात येणार असून त्यानंतर वैजापूर व कोपरगावला पाणी देण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज