म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आठ दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करा. व्यवस्थेत सुधारणा करा, असे स्पष्ट आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्वसाधारण सभेत दिले होते. त्याकडे अधिकाऱ्यांनी मात्र दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा विस्कळीतच आहे. दूषित पाण्याच्या समस्या देखील सोडवण्यात आल्या नाही. या प्रकारामुळे नगरसेवक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
महापौर घोडेले यांच्या कार्यकाळातील पहिली सर्वसाधारण सभा १५ नोव्हेंबर रोजी झाली. या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याच्या समस्या मांडल्या. जुन्या शहरात चार - पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे समान पाणी वाटपाची मागणी काही नगरसेवकांनी केली. पाणीपुरवठ्याच्या वेळा निश्चित नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ होते. अनेक तास पाण्याची वाट पाहण्यात घालवावे लागतात. अनेक भागात दूषित पाण्याची समस्या गंभीर असून, त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी देखील नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केल्या होत्या. नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींचा आढावा घेवून महापौरांनी पाणीपुरवठा विभागाला कारभार सुधारण्यासाठी आठ दिवसांचा अवधी दिला. ‘आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करा. वॉर्डांमधील दूषित पाण्याचे प्रश्न सोडवा,’ असे आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.
पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी महापौरांनी दिलेला आठ दिवसांचा कालावधी मंगळवारी संपत आहे. त्यामुळे ‘मटा’ने पाणीप्रश्नाचा आढावा घेतला असता, बहुशांत वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीतच असल्याचे लक्षात आले. जायकवाडी येथील पंपहाउसचे केबल दोन दिवसांपूर्वी तुटले. तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले. अनेक भागात सकाळी होणारा पाणीपुरवठा दुपारी किंवा सायंकाळी झाल्याच्या तक्रारी आहेत. तांत्रिक समस्येमुळे दोन दिवसाचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असला, तरी त्याअगोदरच्या दिवसांत देखील नियमित वेळेत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा झाला नसल्याच्या तक्रारी आहेत. जलकुंभ भरत नसल्यामुळे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही आणि जलकुंभ भरण्यासाठी विशेष उपयायोजना देखील केली जात नाही, असे जाणकारांचे मत आहे. वॉर्डांमधील दूषित पाण्याच्या समस्या देखील सुटलेल्या नाहीत.
सर्वसाधारण सभेनंतर पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने वॉर्डात काहीच काम झाले नाही. हनुमाननगरच्या गल्ली क्रमांक पाचमधील दूषित पाण्याचा प्रश्न कायमच आहे. मी निवडून आल्यापासून पाणीप्रश्नाचा पाठपुरावा करीत आहे, पण अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. आता महापौरांनीच यात लक्ष घातले पाहिजे.
- मीना गायके, नगरसेविका, पुंडलिकनगर
पाणीपुरवठ्यातील अनियमितपणा वाढला आहे, हे खरे. दूषित पाण्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या होत्या. त्यातही काहीच काम झाले नाही. पाणीपुरवठा विभाग सक्षम करण्याची गरज आहे. शहर अभियंत्यांना या विभागाकडे विशेष लक्ष द्यायला सांगू. पाणीपुरवठ्याबद्दल आढावा बैठकही घेतली जाईल.
- नंदकुमार घोडेले, महापौर.
वॉर्डात दूषित पाण्याची समस्या कायम आहे. पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम केले होते, पण त्यात पुन्हा बिघाड झाली आहे. नेमकेपणाने काम झालेले नाही. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होतच आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील कामे होत नाहीत म्हणून आता वॉर्डातील महिलांचे शिष्टमंडळ घेऊन महापौर, आयुक्तांना भेटायला जाण्याचे नियोजन आहे.
- अंकिता विधाते, नगरसेविका, विष्णुनगर
महापौरांनी इशारा दिलेला असला तरी आठ दिवसांत पाणीपुरवठा विभागाने कोणतेच काम केले नाही. एन-तीनमधील पाणीपुरवठा विस्कळीतच आहे. पारिजातनगर, गुरूसहानीनगरचा दूषित पाण्याचा प्रश्न देखील सुटलेला नाही. त्यामुळे उपोषण करण्याच्या मुद्यावर मी ठाम आहे.
- अॅड. माधुरी अदवंत, नगरसेविका, सिडको, एन-तीन
आठ दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करा. व्यवस्थेत सुधारणा करा, असे स्पष्ट आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्वसाधारण सभेत दिले होते. त्याकडे अधिकाऱ्यांनी मात्र दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा विस्कळीतच आहे. दूषित पाण्याच्या समस्या देखील सोडवण्यात आल्या नाही. या प्रकारामुळे नगरसेवक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
महापौर घोडेले यांच्या कार्यकाळातील पहिली सर्वसाधारण सभा १५ नोव्हेंबर रोजी झाली. या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याच्या समस्या मांडल्या. जुन्या शहरात चार - पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे समान पाणी वाटपाची मागणी काही नगरसेवकांनी केली. पाणीपुरवठ्याच्या वेळा निश्चित नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ होते. अनेक तास पाण्याची वाट पाहण्यात घालवावे लागतात. अनेक भागात दूषित पाण्याची समस्या गंभीर असून, त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी देखील नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केल्या होत्या. नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींचा आढावा घेवून महापौरांनी पाणीपुरवठा विभागाला कारभार सुधारण्यासाठी आठ दिवसांचा अवधी दिला. ‘आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करा. वॉर्डांमधील दूषित पाण्याचे प्रश्न सोडवा,’ असे आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.
पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी महापौरांनी दिलेला आठ दिवसांचा कालावधी मंगळवारी संपत आहे. त्यामुळे ‘मटा’ने पाणीप्रश्नाचा आढावा घेतला असता, बहुशांत वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीतच असल्याचे लक्षात आले. जायकवाडी येथील पंपहाउसचे केबल दोन दिवसांपूर्वी तुटले. तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले. अनेक भागात सकाळी होणारा पाणीपुरवठा दुपारी किंवा सायंकाळी झाल्याच्या तक्रारी आहेत. तांत्रिक समस्येमुळे दोन दिवसाचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असला, तरी त्याअगोदरच्या दिवसांत देखील नियमित वेळेत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा झाला नसल्याच्या तक्रारी आहेत. जलकुंभ भरत नसल्यामुळे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही आणि जलकुंभ भरण्यासाठी विशेष उपयायोजना देखील केली जात नाही, असे जाणकारांचे मत आहे. वॉर्डांमधील दूषित पाण्याच्या समस्या देखील सुटलेल्या नाहीत.
सर्वसाधारण सभेनंतर पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने वॉर्डात काहीच काम झाले नाही. हनुमाननगरच्या गल्ली क्रमांक पाचमधील दूषित पाण्याचा प्रश्न कायमच आहे. मी निवडून आल्यापासून पाणीप्रश्नाचा पाठपुरावा करीत आहे, पण अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. आता महापौरांनीच यात लक्ष घातले पाहिजे.
- मीना गायके, नगरसेविका, पुंडलिकनगर
पाणीपुरवठ्यातील अनियमितपणा वाढला आहे, हे खरे. दूषित पाण्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या होत्या. त्यातही काहीच काम झाले नाही. पाणीपुरवठा विभाग सक्षम करण्याची गरज आहे. शहर अभियंत्यांना या विभागाकडे विशेष लक्ष द्यायला सांगू. पाणीपुरवठ्याबद्दल आढावा बैठकही घेतली जाईल.
- नंदकुमार घोडेले, महापौर.
वॉर्डात दूषित पाण्याची समस्या कायम आहे. पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम केले होते, पण त्यात पुन्हा बिघाड झाली आहे. नेमकेपणाने काम झालेले नाही. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होतच आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील कामे होत नाहीत म्हणून आता वॉर्डातील महिलांचे शिष्टमंडळ घेऊन महापौर, आयुक्तांना भेटायला जाण्याचे नियोजन आहे.
- अंकिता विधाते, नगरसेविका, विष्णुनगर
महापौरांनी इशारा दिलेला असला तरी आठ दिवसांत पाणीपुरवठा विभागाने कोणतेच काम केले नाही. एन-तीनमधील पाणीपुरवठा विस्कळीतच आहे. पारिजातनगर, गुरूसहानीनगरचा दूषित पाण्याचा प्रश्न देखील सुटलेला नाही. त्यामुळे उपोषण करण्याच्या मुद्यावर मी ठाम आहे.
- अॅड. माधुरी अदवंत, नगरसेविका, सिडको, एन-तीन