अ‍ॅपशहर

पाणी टंचाईचे प्रस्ताव निकाली काढा ः जाधव

एकही गाव टंचाईग्रस्त राहू नये म्हणून काटेकोर नियोजन करावे. तालुक्यासाठी संभाव्य पाणीटंचाईसाठी कृती आराखडा तयार करून टंचाईचे प्रस्ताव विनाविलंब निकाली काढण्याचे आवाहन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी केले.

Maharashtra Times 11 Dec 2017, 3:00 am
कन्नड : एकही गाव टंचाईग्रस्त राहू नये म्हणून काटेकोर नियोजन करावे. तालुक्यासाठी संभाव्य पाणीटंचाईसाठी कृती आराखडा तयार करून टंचाईचे प्रस्ताव विनाविलंब निकाली काढण्याचे आवाहन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water scarcity proposal dispose jadhav
पाणी टंचाईचे प्रस्ताव निकाली काढा ः जाधव


पाणीटंचाई निवारण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. पाणी टंचाई निवारणार्थ प्रत्येक ग्रामपंचायतीस एक विहीर एमआरईजीएस योजनेतून करण्यासाठी पंचायत समितीने मंजुरी द्यावी; तसेच एखाद्या ‘डीपी’वर दहा वीज जोडण्या असतील, तेथे दोन जणांनी बिल भरले तरीही डीपी सुरू करावी. बिल भरले असेल, त्यांचा वीजपुरवठा सुरू करावा, अशी सूचना वीज वितरण अधिकाऱ्यांना दिल्या. पाण्याची व्यवस्था नसेल तेथे विंधन विहिरी घ्याव्यात. हापसा नसलेल्या ठिकाणी टँकरने पाणी पुरविण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीत कृषी अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सेवक, लोकप्रतिनिधी यांच्याकडून सर्कल निहाय गावसमस्या जाणून घेऊन संबंधित यंत्रणेला त्या समस्या निवारण्यासाठी सूचना देण्यात आल्या. गटविकास अधिकारी विजय परदेशी यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार महेश सुधळकर यांनी पाणीटंचाई दूर करण्याच्या उपाययोजनांचे प्रस्तावाबाबत व आजची पाणीटंचाईची परिस्थिती कशी आहे, याबाबत मार्गदर्शन केले. बैठकीस नायब तहसीलदार हारूण शेख, समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल, पंचायत समिती सभापती मीना मोकासे, तालुका कृषी अधिकारी एस. आर. पेंडभाजे, एस. आर. मामीडवार, शाखा अभियंता एल. टी. राठोड, पंचायत समिती पाणीपुरवठा व नियोजन व्यवस्थापक एम. एम. देवकर, विस्ताराधिकारी एस. डी. चव्हाण, संजय भोसले आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज