म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जलवाहिनीच्या फुटलेल्या व्हॉल्व्हची दुरुस्ती केल्यानंतर औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा शनिवारी सकाळी सुरळीत सुरू झाला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह पैठण रोडवरील ताहेरपुर जवळ गुरुवारी रात्री फुटला होता. त्यामुळे या जलवाहिनीचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दरम्यानच्या काळात १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु त्याला देखील मर्यादा आल्यामुळे या जलवाहिनीचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. दोन्ही जलवाहिनीतून केला जाणारा पाणीपुरवठा बंद केल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसांनी पुढे ढकलले जाईल असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर जायकवाडीहून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शनिवारी सकाळी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत झाला. बहुतेक भागात पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गळती बंद करण्याचे काम
एअर व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी ७०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळत्या बंद करण्याचे कामदेखील करण्यात आले. ढोरकी, ढाकेफळ फाटा आदी ठिकाणच्या गळती बंद करण्याचे काम करण्यात आले. जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद न करता ही कामे करण्यात आल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी कळविले आहे.
जलवाहिनीच्या फुटलेल्या व्हॉल्व्हची दुरुस्ती केल्यानंतर औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा शनिवारी सकाळी सुरळीत सुरू झाला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह पैठण रोडवरील ताहेरपुर जवळ गुरुवारी रात्री फुटला होता. त्यामुळे या जलवाहिनीचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दरम्यानच्या काळात १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु त्याला देखील मर्यादा आल्यामुळे या जलवाहिनीचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. दोन्ही जलवाहिनीतून केला जाणारा पाणीपुरवठा बंद केल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसांनी पुढे ढकलले जाईल असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर जायकवाडीहून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शनिवारी सकाळी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत झाला. बहुतेक भागात पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गळती बंद करण्याचे काम
एअर व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी ७०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळत्या बंद करण्याचे कामदेखील करण्यात आले. ढोरकी, ढाकेफळ फाटा आदी ठिकाणच्या गळती बंद करण्याचे काम करण्यात आले. जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद न करता ही कामे करण्यात आल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी कळविले आहे.