म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘रक्षाबंधनाच्या सणानिमित्त लाडक्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी टपाल खात्याने खास वॉटरप्रूफ पाकीट तयार केली आहेत. तसेच आधार कार्डातील दुरुस्तीसाठी प्रधान डाक घर येथे आधार सुधार केंद्र सुरू केले आहे,’ अशी माहिती पोस्ट मास्टर जनरल प्रणव कुमार यांनी मंगळवारी (१९ जुलै) पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रणव कुमार म्हणाले, ‘वॉटरप्रूफ पाकिटाचा दर दहा रुपये आहे. शाळा, कॉलेज परिसरातही तात्पुरते विक्री केंद्र उघडण्यात येणार आहे. आधार कार्डसंबंधी असलेल्या दुरुस्तीसाठी मुख्य पोस्ट ऑफिससह पैठण, जालना, अंबड यासह विभागात २० ठिकाणी आधार सुधार केंद्र सुरू केले आहे. यात नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाइल तसेच ई मेलची दुरुस्ती करून मिळेल. प्रत्येक दुरुस्तीसाठी २५ रुपये शुल्क आकारले जाईल. ‘आरआयसीटी प्रोजेक्ट’अंतर्गत (रुरल इम्फॉरमेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) मुख्य टपाल कार्यालयासह ग्रामीण भागातील कार्यालयांची डिजिटल जोडणी करण्यात येत आहे. यात ग्रामीण भागातील टपाल ऑफिसला एमएसडी मशीन (मेन कॉम्युटिंग डिव्हाइस) देण्यात आले असून हा पायलट प्रोजेक्ट औरंगाबाद विभागाअंतर्गत असलेल्या जळगाव जिल्ह्यात राबविण्यात आला. यामुळे खातेदारांना जलद गतीने सेवा मिळत असून औरंगाबादेत पहिल्या टप्प्यात २३ व नंतर १०० ठिकाणी हे मशिन देण्यात येणार आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी अधीक्षक ए. एच. शेख, एस. बी. लिंगायत, एस. एस. परळीकर, एस. एल. बनसोडे आदी उपस्थित होते.
‘रक्षाबंधनाच्या सणानिमित्त लाडक्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी टपाल खात्याने खास वॉटरप्रूफ पाकीट तयार केली आहेत. तसेच आधार कार्डातील दुरुस्तीसाठी प्रधान डाक घर येथे आधार सुधार केंद्र सुरू केले आहे,’ अशी माहिती पोस्ट मास्टर जनरल प्रणव कुमार यांनी मंगळवारी (१९ जुलै) पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रणव कुमार म्हणाले, ‘वॉटरप्रूफ पाकिटाचा दर दहा रुपये आहे. शाळा, कॉलेज परिसरातही तात्पुरते विक्री केंद्र उघडण्यात येणार आहे. आधार कार्डसंबंधी असलेल्या दुरुस्तीसाठी मुख्य पोस्ट ऑफिससह पैठण, जालना, अंबड यासह विभागात २० ठिकाणी आधार सुधार केंद्र सुरू केले आहे. यात नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाइल तसेच ई मेलची दुरुस्ती करून मिळेल. प्रत्येक दुरुस्तीसाठी २५ रुपये शुल्क आकारले जाईल. ‘आरआयसीटी प्रोजेक्ट’अंतर्गत (रुरल इम्फॉरमेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) मुख्य टपाल कार्यालयासह ग्रामीण भागातील कार्यालयांची डिजिटल जोडणी करण्यात येत आहे. यात ग्रामीण भागातील टपाल ऑफिसला एमएसडी मशीन (मेन कॉम्युटिंग डिव्हाइस) देण्यात आले असून हा पायलट प्रोजेक्ट औरंगाबाद विभागाअंतर्गत असलेल्या जळगाव जिल्ह्यात राबविण्यात आला. यामुळे खातेदारांना जलद गतीने सेवा मिळत असून औरंगाबादेत पहिल्या टप्प्यात २३ व नंतर १०० ठिकाणी हे मशिन देण्यात येणार आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी अधीक्षक ए. एच. शेख, एस. बी. लिंगायत, एस. एस. परळीकर, एस. एल. बनसोडे आदी उपस्थित होते.