म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिके पाण्यात गेली आहेत. तालुक्यातील संपूर्ण एक लाख हजार हेक्टरवरील मका, सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मिरची, भाजीपाला पिकाला या पावसाने उद्धवस्त केले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत, तर शेतकऱ्यांच्या नजरा शासकीय मदतीकडे लागल्या आहेत.
मका, सोयाबीन, ज्वारी सोंगणीच्या काळात वरुणराजा कोपला, अन होत्याचे नव्हते झाले आहे. यंदा शेतकऱ्यांनी तब्बल ४४ हजार ८५८ हेक्टरवर मका, ४० हजार ५१ हेक्टरवर कपाशीची, तर उर्वरित १३ हजार ८५५ हेक्टरवर सोयाबीन, बाजरी, ज्वारी आदी पिकांची पेरणी केली होती, परंतु पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला.
मागील सर्व विक्रम मोडणाऱ्या या पावसाने केवळ पिकांचे नुकसान झाले नाही, तर अनेकांच्या घरांची पडझड झाली, विहिरी खचल्या. शेती वाहून गेली. गायी, शेळ्या-मेंढ्याही दगावल्या. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे भरून न निघणारे आहे.
शासनाच्या आदेशाने नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे. २०१५ शासनच्या नैसर्गिक आपत्ती निकषाप्रमाणे पंचनामे करूण अहवाल सादर करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी मका, सोयाबीनचा विमा काढलेला आहे, परंतु नुकसान सूचना अर्ज केलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी दोन दिवसात अर्ज दाखल करावे.
- दीपक गवळी
तालुका कृषी अधिकारी
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिके पाण्यात गेली आहेत. तालुक्यातील संपूर्ण एक लाख हजार हेक्टरवरील मका, सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मिरची, भाजीपाला पिकाला या पावसाने उद्धवस्त केले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत, तर शेतकऱ्यांच्या नजरा शासकीय मदतीकडे लागल्या आहेत.
मका, सोयाबीन, ज्वारी सोंगणीच्या काळात वरुणराजा कोपला, अन होत्याचे नव्हते झाले आहे. यंदा शेतकऱ्यांनी तब्बल ४४ हजार ८५८ हेक्टरवर मका, ४० हजार ५१ हेक्टरवर कपाशीची, तर उर्वरित १३ हजार ८५५ हेक्टरवर सोयाबीन, बाजरी, ज्वारी आदी पिकांची पेरणी केली होती, परंतु पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला.
मागील सर्व विक्रम मोडणाऱ्या या पावसाने केवळ पिकांचे नुकसान झाले नाही, तर अनेकांच्या घरांची पडझड झाली, विहिरी खचल्या. शेती वाहून गेली. गायी, शेळ्या-मेंढ्याही दगावल्या. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे भरून न निघणारे आहे.
शासनाच्या आदेशाने नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे. २०१५ शासनच्या नैसर्गिक आपत्ती निकषाप्रमाणे पंचनामे करूण अहवाल सादर करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी मका, सोयाबीनचा विमा काढलेला आहे, परंतु नुकसान सूचना अर्ज केलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी दोन दिवसात अर्ज दाखल करावे.
- दीपक गवळी
तालुका कृषी अधिकारी