म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘स्त्रीचे विश्व कायम पाण्याभोवती फिरते, मात्र तिच्या आयुष्यात कायम दुष्काळ असतो,’ अशी खंत महिला अभ्यासकांनी शनिवारी व्यक्त केली. त्या महसूल प्रबोधिनीमध्ये आयोजित ‘महिला व पाणी धोरण’ या परिसंवादात बोलत होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व विभागीय केंद्र औरंगाबाद, विकास अध्ययन केंद्र, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर अॅक्शन अॅडच्या राज्यप्रमुख नीरजा भटनागर, स्त्री अभ्यासक डॉ. वृषाली किन्हाळकर, पत्रकार दीप्ती राऊत, विकास अध्ययन केंद्राचे संचालक सुरेश शेळके, नीलेश राऊत, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव उपस्थित होते. या संस्थांच्या वतीने ‘एकल महिला व पाणीप्रश्न’ या विषयावर अभ्यास करण्यात आला होता. या सर्वेक्षणाचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले.
यावेळी डॉ. किन्हाळकर म्हणाल्या, ‘एकल महिला, दुष्काळ व पाणी समानार्थी शब्द आहेत. आयुष्यभर ती पाणी भरते. घरातल्या कामांमध्येही तिचे सगळे विश्व पाण्याभोवती असते. पाण्यासाठी कष्ट घेताना तिच्या डोळ्यांत पाणी येते, पण त्या पाण्याची किंमत ना पुरुषाला ना स्त्रीला. म्हणूनच तिच्या आयुष्यात कायम दुष्काळ असतो. जिवंत असताना तिला तिनेच आणलेले पाणी कुणी देत नाही. बस मरतानाच तिला पाणी मिळते.’
नीरजा भटनागर म्हणाल्या, ‘जेव्हा पैशांचा प्रश्न येतो तेव्हा स्त्रीचे अधिकार जप्त होतात. ही सुरुवात घरापासूनच व्हायला हवी. ती एकटी, असहाय्य आहे म्हणत बहुतांशवेळा ढोंग माजवले जाते. त्यापेक्षा तिला या देशाची नागरिक समजा. जेणेकरून तिला एका स्वतंत्र नागरिकाचे अधिकार मिळतील. दुसरे म्हणजे ती घरी असते. म्हणजे ती काहीच करत नाही असा अर्थ लावणे म्हणजे तिच्या प्रेमाचा, तिच्या काळजीचा अपमानच आहे. अॅक्शन अॅडने या विषयावर ‘मेरी बीवी कुछ नही करती’ अशी डॉक्युमेंटरी बनवली होती. ज्यामध्ये सर्व पुरूष असेच म्हणाले की त्यांची घरातली सर्व कामे पत्नी करतात, पण बाकी काही करत नाही. प्रत्येक कामाची तुलना पैशांमध्ये होत नाही. काही देशांमध्ये गृहिणींना कामगाराचा दर्जा आहे. आपण दर्जा तर दूर साधे तिच्या कामाचे कौतुक करत नाही.’ यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, प्रिया धारूरकर, फुलतांबा आशा केंद्राचे धनंजय धनवटे, पत्रकार पद्मभूषण देशपांडे, प्रा. युसूफ बेन्नूर आदी उपस्थित होते.
एकही मागणी पूर्ण नाही
दीप्ती राऊत म्हणाल्या, ‘महिला ही संकल्पना अजून स्वीकारलीच गेली नाही. समाजात तिचे स्थान दुर्लक्षित आहेच. पण माध्यम प्रतिनिधी म्हणूनही मला खेदाने म्हणावे लागते की, ती पहिल्या पानावर दोनवेळा असते. एक तर तेव्हा जेव्हा ती अंतराळात जाते आणि दुसऱ्यांदा जेव्हा तिच्यावर बलात्कार होतो तेव्हा. एरवी मधल्या राखाडी पानांमध्ये तिचे अस्तित्व नसतेच. १९९४ मध्ये औरंगाबादमध्ये परितक्त्या हक्क परिषद घेण्यात आली. त्यावेळी सहा लाख परितक्त्या असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यातून एकल महिलांचे प्रश्न व मागण्या पुढे आल्या. गंमत म्हणजे एकल महिला व पाणी प्रश्न अभ्यासातही त्याच मागण्या आल्या आहेत. अर्थात २०१७पर्यंत परितक्त्यांची संख्या वाढली व आता आधार कार्ड सक्तीचे झाले. हे दोन बदल वगळता इतक्या वर्षात शासनाला या महिलांची एकही मागणी पूर्ण करता आली नाही. कारण आपत्ती कोणतीही असली तरी त्याचे परिणाम स्त्रीलाच भोगावे लागतात.’
‘स्त्रीचे विश्व कायम पाण्याभोवती फिरते, मात्र तिच्या आयुष्यात कायम दुष्काळ असतो,’ अशी खंत महिला अभ्यासकांनी शनिवारी व्यक्त केली. त्या महसूल प्रबोधिनीमध्ये आयोजित ‘महिला व पाणी धोरण’ या परिसंवादात बोलत होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व विभागीय केंद्र औरंगाबाद, विकास अध्ययन केंद्र, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर अॅक्शन अॅडच्या राज्यप्रमुख नीरजा भटनागर, स्त्री अभ्यासक डॉ. वृषाली किन्हाळकर, पत्रकार दीप्ती राऊत, विकास अध्ययन केंद्राचे संचालक सुरेश शेळके, नीलेश राऊत, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव उपस्थित होते. या संस्थांच्या वतीने ‘एकल महिला व पाणीप्रश्न’ या विषयावर अभ्यास करण्यात आला होता. या सर्वेक्षणाचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले.
यावेळी डॉ. किन्हाळकर म्हणाल्या, ‘एकल महिला, दुष्काळ व पाणी समानार्थी शब्द आहेत. आयुष्यभर ती पाणी भरते. घरातल्या कामांमध्येही तिचे सगळे विश्व पाण्याभोवती असते. पाण्यासाठी कष्ट घेताना तिच्या डोळ्यांत पाणी येते, पण त्या पाण्याची किंमत ना पुरुषाला ना स्त्रीला. म्हणूनच तिच्या आयुष्यात कायम दुष्काळ असतो. जिवंत असताना तिला तिनेच आणलेले पाणी कुणी देत नाही. बस मरतानाच तिला पाणी मिळते.’
नीरजा भटनागर म्हणाल्या, ‘जेव्हा पैशांचा प्रश्न येतो तेव्हा स्त्रीचे अधिकार जप्त होतात. ही सुरुवात घरापासूनच व्हायला हवी. ती एकटी, असहाय्य आहे म्हणत बहुतांशवेळा ढोंग माजवले जाते. त्यापेक्षा तिला या देशाची नागरिक समजा. जेणेकरून तिला एका स्वतंत्र नागरिकाचे अधिकार मिळतील. दुसरे म्हणजे ती घरी असते. म्हणजे ती काहीच करत नाही असा अर्थ लावणे म्हणजे तिच्या प्रेमाचा, तिच्या काळजीचा अपमानच आहे. अॅक्शन अॅडने या विषयावर ‘मेरी बीवी कुछ नही करती’ अशी डॉक्युमेंटरी बनवली होती. ज्यामध्ये सर्व पुरूष असेच म्हणाले की त्यांची घरातली सर्व कामे पत्नी करतात, पण बाकी काही करत नाही. प्रत्येक कामाची तुलना पैशांमध्ये होत नाही. काही देशांमध्ये गृहिणींना कामगाराचा दर्जा आहे. आपण दर्जा तर दूर साधे तिच्या कामाचे कौतुक करत नाही.’ यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, प्रिया धारूरकर, फुलतांबा आशा केंद्राचे धनंजय धनवटे, पत्रकार पद्मभूषण देशपांडे, प्रा. युसूफ बेन्नूर आदी उपस्थित होते.
एकही मागणी पूर्ण नाही
दीप्ती राऊत म्हणाल्या, ‘महिला ही संकल्पना अजून स्वीकारलीच गेली नाही. समाजात तिचे स्थान दुर्लक्षित आहेच. पण माध्यम प्रतिनिधी म्हणूनही मला खेदाने म्हणावे लागते की, ती पहिल्या पानावर दोनवेळा असते. एक तर तेव्हा जेव्हा ती अंतराळात जाते आणि दुसऱ्यांदा जेव्हा तिच्यावर बलात्कार होतो तेव्हा. एरवी मधल्या राखाडी पानांमध्ये तिचे अस्तित्व नसतेच. १९९४ मध्ये औरंगाबादमध्ये परितक्त्या हक्क परिषद घेण्यात आली. त्यावेळी सहा लाख परितक्त्या असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यातून एकल महिलांचे प्रश्न व मागण्या पुढे आल्या. गंमत म्हणजे एकल महिला व पाणी प्रश्न अभ्यासातही त्याच मागण्या आल्या आहेत. अर्थात २०१७पर्यंत परितक्त्यांची संख्या वाढली व आता आधार कार्ड सक्तीचे झाले. हे दोन बदल वगळता इतक्या वर्षात शासनाला या महिलांची एकही मागणी पूर्ण करता आली नाही. कारण आपत्ती कोणतीही असली तरी त्याचे परिणाम स्त्रीलाच भोगावे लागतात.’