अ‍ॅपशहर

जालना खामगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात

राज्यात ४८ रेल्वेमार्ग सर्वेक्षण घोषित करण्यात आलेले आहेत. यात आतापर्यंत फक्त तीन मार्गाचेच सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 2 Mar 2021, 5:43 pm
औरंगाबाद : राज्यात ४८ रेल्वेमार्ग सर्वेक्षण घोषित करण्यात आलेले आहेत. यात आतापर्यंत फक्त तीन मार्गाचेच सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा अहवाल अंतिम करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती रेल्वे विभागाचे डेप्युटी चिफ ऑपरेशन मॅनेजर (सर्व्हे) सुरेश चंद्र जैन यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम work of jalna khamgaon railway line is in final stage
जालना खामगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात


रेल्वे विभागाकडून सुचित करण्यात आलेल्या राज्यातील ४८ रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करायचे आहे. रेल्वे सर्वेक्षणामध्ये सध्याच्या रेल्वे मार्गाची गरज, भविष्यात दहा वर्षानंतर या रेल्वेचा होणारा वापर तसेच यातून रेल्वे विभागाला कशा पद्धतीने उत्पन्न मिळेल, याची पूर्ण माहिती काढली जाते. त्या आधारावर रेल्वेचा सर्वेक्षण आणि उत्पन्न तसेच रेल्वे तयार करण्यासाठी होणारा खर्च याची गोळाबेरीज करून सर्वेक्षण अंतिम करण्यात येत आहे. जैन यांनी राज्यातील ४८ रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण आपल्याकडे असल्याचे सांगितले. यात लातूर-कलबुर्गी, जालना-खामगाव आणि भुसावळ-पाचोरा-जामनेर-बोदवड या मार्गांचे अहवाल सध्या तयार केले जात असल्याचेही जैन यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज