म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वार्धक्यातील आजार तरुणपणी झाल्यामुळे उत्तम आरोग्यासाठी योग वर्गात गर्दी वाढली आहे. विशेषतः पस्तीशीनंतर योगासने शिकण्याकडे कल वाढला असून शहरात जवळपास ५० योग वर्ग आहेत. मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार आणि संसर्गजन्य रोगांवर मात करण्यासाठी योग साधकांची संख्या वाढत आहे.
शहरी जीवनमान प्रचंड धावपळीचे असल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ऐन पस्तीशीत विविध आजार होतात. औषधोपचार करतानाच शिस्तबद्ध व नियमित व्यायामावर जागरूक नागरिक भर देत आहेत. योग प्रणालीबाबत जागरुकता वाढल्यानंतर योग करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. परिणामी, योग वर्गांची संख्या वाढली असून लहान-मोठे ५० योग वर्ग सुरू आहेत. या वर्गाचे शुल्क दरमहा २०० ते ५०० रुपये आहे. ‘सर्टिफिकेट कोर्स’सह वर्गांची उलाढाल लाखो रूपये आहे. योग शिक्षकांना रोजगार असल्यामुळे अनेकजण प्रशिक्षण घेऊन वर्ग चालवत आहेत. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी योगासने करीत आहेत. नियमित व्यायामाचा अभाव आणि आधुनिक जीवनशैलीने आजार वाढले आहेत. या आजारांना रोखण्यासाठी आदर्श योगप्रणाली अंमलात आणली आहे. शहरात रामदेवबाबा आणि श्री श्री रविशंकर यांचे अनुयायी वर्ग चालवतात. जुन्या वर्गातील प्रशिक्षित अनुयायांनी स्वतंत्र वर्ग सुरू केले आहेत. दररोज तासभर योगासने केल्यानंतर दिवसभर उत्साह टिकत असल्याचा अनुभव आहे. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य असा दुहेरी उद्देश ठेवून अनेकजण वर्गात येतात असे तज्ज्ञांनी सांगितले. दैनंदिन वर्गाशिवाय एक आठवडा आणि महिनाभराचे वर्ग घेतात. या वर्गात चार तास योगासने शिकवत असल्याने शुल्क जास्त असते. प्रशस्त हॉल आणि निष्णात प्रशिक्षक असल्यास शुल्क वाढते. सध्या ५० योग वर्ग सुरू असून बॅचेसमध्ये हजारो साधक योगासने करीत आहेत. आयुर्वेदाचा प्रचार वाढल्याने शहरात आयुर्वेदिक वस्तूंची दुकाने वाढली आहेत. शालेय स्तरावर योग प्रचार असल्यामुळे योगासन करण्याचे प्रमाण वाढले आहे. तणावमुक्ती आणि मनःशांतीसाठी योग सर्वोत्तम उपाय आहे. योगासने वाढत असल्याने आर्थिक उलाढाल वाढण्याची शक्यता आहे.
जागरूकता वाढली
योगासने उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असल्याची जागरूकता वाढली आहे. सकाळी आणि सायंकाळी शहरात योग वर्गांना गर्दी असते. प्रत्येक स्तरातील नागरिक योग करीत आहेत. शहरात किमान १५ टक्के नागरिक वर्गात किंवा घरी नियमित योगासने करतात. केंद्र सरकार प्रसार करीत असल्यामुळे अनेकजण योगाकडे वळले आहेत.
योगासनांचा उत्तम आरोग्यासाठी खूप फायदा झाला. हातपायातील लवचिकता कमी झाल्यामुळे योग सुरू केले होते. हर्सूल परिसरातील वर्गात दररोज ५० साधक येतात. सध्या जीवनात योगासनांची खूप गरज आहे. वार्धक्यात उत्साह टिकवण्यासाठी योग आवश्यक आहेत. वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त व्यक्तींना योगासनांनी तारले आहे.
- कविता गावंडे, योग प्रशिक्षक
वार्धक्यातील आजार तरुणपणी झाल्यामुळे उत्तम आरोग्यासाठी योग वर्गात गर्दी वाढली आहे. विशेषतः पस्तीशीनंतर योगासने शिकण्याकडे कल वाढला असून शहरात जवळपास ५० योग वर्ग आहेत. मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार आणि संसर्गजन्य रोगांवर मात करण्यासाठी योग साधकांची संख्या वाढत आहे.
शहरी जीवनमान प्रचंड धावपळीचे असल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ऐन पस्तीशीत विविध आजार होतात. औषधोपचार करतानाच शिस्तबद्ध व नियमित व्यायामावर जागरूक नागरिक भर देत आहेत. योग प्रणालीबाबत जागरुकता वाढल्यानंतर योग करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. परिणामी, योग वर्गांची संख्या वाढली असून लहान-मोठे ५० योग वर्ग सुरू आहेत. या वर्गाचे शुल्क दरमहा २०० ते ५०० रुपये आहे. ‘सर्टिफिकेट कोर्स’सह वर्गांची उलाढाल लाखो रूपये आहे. योग शिक्षकांना रोजगार असल्यामुळे अनेकजण प्रशिक्षण घेऊन वर्ग चालवत आहेत. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी योगासने करीत आहेत. नियमित व्यायामाचा अभाव आणि आधुनिक जीवनशैलीने आजार वाढले आहेत. या आजारांना रोखण्यासाठी आदर्श योगप्रणाली अंमलात आणली आहे. शहरात रामदेवबाबा आणि श्री श्री रविशंकर यांचे अनुयायी वर्ग चालवतात. जुन्या वर्गातील प्रशिक्षित अनुयायांनी स्वतंत्र वर्ग सुरू केले आहेत. दररोज तासभर योगासने केल्यानंतर दिवसभर उत्साह टिकत असल्याचा अनुभव आहे. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य असा दुहेरी उद्देश ठेवून अनेकजण वर्गात येतात असे तज्ज्ञांनी सांगितले. दैनंदिन वर्गाशिवाय एक आठवडा आणि महिनाभराचे वर्ग घेतात. या वर्गात चार तास योगासने शिकवत असल्याने शुल्क जास्त असते. प्रशस्त हॉल आणि निष्णात प्रशिक्षक असल्यास शुल्क वाढते. सध्या ५० योग वर्ग सुरू असून बॅचेसमध्ये हजारो साधक योगासने करीत आहेत. आयुर्वेदाचा प्रचार वाढल्याने शहरात आयुर्वेदिक वस्तूंची दुकाने वाढली आहेत. शालेय स्तरावर योग प्रचार असल्यामुळे योगासन करण्याचे प्रमाण वाढले आहे. तणावमुक्ती आणि मनःशांतीसाठी योग सर्वोत्तम उपाय आहे. योगासने वाढत असल्याने आर्थिक उलाढाल वाढण्याची शक्यता आहे.
जागरूकता वाढली
योगासने उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असल्याची जागरूकता वाढली आहे. सकाळी आणि सायंकाळी शहरात योग वर्गांना गर्दी असते. प्रत्येक स्तरातील नागरिक योग करीत आहेत. शहरात किमान १५ टक्के नागरिक वर्गात किंवा घरी नियमित योगासने करतात. केंद्र सरकार प्रसार करीत असल्यामुळे अनेकजण योगाकडे वळले आहेत.
योगासनांचा उत्तम आरोग्यासाठी खूप फायदा झाला. हातपायातील लवचिकता कमी झाल्यामुळे योग सुरू केले होते. हर्सूल परिसरातील वर्गात दररोज ५० साधक येतात. सध्या जीवनात योगासनांची खूप गरज आहे. वार्धक्यात उत्साह टिकवण्यासाठी योग आवश्यक आहेत. वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त व्यक्तींना योगासनांनी तारले आहे.
- कविता गावंडे, योग प्रशिक्षक