म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातले माऊंट एव्हरेस्ट अशी ख्यात असणारे, गिर्यारोहकांना नेहमीच खुणावणारे कळसूबाई शिखर सर करत शहरातील सात युवकांनी त्याला गवसणी घातली.
गिर्यारोहण हा क्रीडा प्रकार खरा तर भन्नाटच. त्यात आपण गुंतलो, की मनाला वेगळेच वेड लागते. प्रदूषित व सततच्या कटकटमय जगण्यातून थोडा वेळ काढून निसर्गाच्या कुशीत, डोंगर रांगाच्या सानिध्यात सर्वस्व विसरून जावून मिळणारा आनंद वेगळाचा. त्यामुळे गिर्यारोहणाकडे सध्या अनेकांचा ओढा वाढला आहे. नामंकित कंपनीत नोकरीला असलेले कीर्तीकुमार वैद्य, सतीश कोल्हे, अनिल जठार, जमीर खान, त्र्यंबक सोनवणे, पवन साळुंके, अविनाश रणमले यांनाही निसर्गभ्रमंतीची आवड निर्माण झाली, ती कंपनीतर्फे आयोजित गौताळा भ्रमंतीमुळे. त्या वेळी त्यांची ज्येष्ठ गिर्यारोहक प्रा. सुभाष फासे यांच्याशी भेट झाली. चर्चेतून साहसी पर्यटन करण्याचा निर्णय या ग्रुपने घेतला. आणि ध्येय ठरले ते रतनगड ते कळसूबाई शिखर सर करण्याचे. फासे सरांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी पूर्व तयारी केली. त्यानंतर २५ जानेवारी रोजी सायंकाळी टिम रतनगडच्या पायथ्याशी पोहचली. तंबूत रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे मोहीम सुरू झाली, ती रतनगड सर करण्याची. प्रा. फासे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासांत सर्वांनी गड सर केला. रॅपलिंगचा थरार अनुभवत सदस्य पुन्हा खाली आले.
मध्यरात्री गाठले शिखर
'एक दिवस मुक्काम व परिसरातील निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर कळसबाई शिखराच्या दिशेने टीमने कूच केले. त्यानंतर निसर्गाचा, ट्रेकिंगचा आनंद घेत पथकाने सायंकाळी शिखर चढण्यास सुरुवात केली. जिद्द, चिकाटीच्या जोरावर मध्यरात्री शिखर गाठले आणि त्यानंतर सूर्योदयाचा असीम आनंद लुटता आला,' अशी माहिती अनिल जठार यांनी 'मटा'शी बोलताना दिली.
राज्यातले माऊंट एव्हरेस्ट अशी ख्यात असणारे, गिर्यारोहकांना नेहमीच खुणावणारे कळसूबाई शिखर सर करत शहरातील सात युवकांनी त्याला गवसणी घातली.
गिर्यारोहण हा क्रीडा प्रकार खरा तर भन्नाटच. त्यात आपण गुंतलो, की मनाला वेगळेच वेड लागते. प्रदूषित व सततच्या कटकटमय जगण्यातून थोडा वेळ काढून निसर्गाच्या कुशीत, डोंगर रांगाच्या सानिध्यात सर्वस्व विसरून जावून मिळणारा आनंद वेगळाचा. त्यामुळे गिर्यारोहणाकडे सध्या अनेकांचा ओढा वाढला आहे. नामंकित कंपनीत नोकरीला असलेले कीर्तीकुमार वैद्य, सतीश कोल्हे, अनिल जठार, जमीर खान, त्र्यंबक सोनवणे, पवन साळुंके, अविनाश रणमले यांनाही निसर्गभ्रमंतीची आवड निर्माण झाली, ती कंपनीतर्फे आयोजित गौताळा भ्रमंतीमुळे. त्या वेळी त्यांची ज्येष्ठ गिर्यारोहक प्रा. सुभाष फासे यांच्याशी भेट झाली. चर्चेतून साहसी पर्यटन करण्याचा निर्णय या ग्रुपने घेतला. आणि ध्येय ठरले ते रतनगड ते कळसूबाई शिखर सर करण्याचे. फासे सरांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी पूर्व तयारी केली. त्यानंतर २५ जानेवारी रोजी सायंकाळी टिम रतनगडच्या पायथ्याशी पोहचली. तंबूत रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे मोहीम सुरू झाली, ती रतनगड सर करण्याची. प्रा. फासे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासांत सर्वांनी गड सर केला. रॅपलिंगचा थरार अनुभवत सदस्य पुन्हा खाली आले.
मध्यरात्री गाठले शिखर
'एक दिवस मुक्काम व परिसरातील निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर कळसबाई शिखराच्या दिशेने टीमने कूच केले. त्यानंतर निसर्गाचा, ट्रेकिंगचा आनंद घेत पथकाने सायंकाळी शिखर चढण्यास सुरुवात केली. जिद्द, चिकाटीच्या जोरावर मध्यरात्री शिखर गाठले आणि त्यानंतर सूर्योदयाचा असीम आनंद लुटता आला,' अशी माहिती अनिल जठार यांनी 'मटा'शी बोलताना दिली.