अ‍ॅपशहर

जुन्या वादातून तरुणास जिवंत जाळले

​​गावातील नालीच्या किरकोळ कारणावरून झालेल्या जुन्या वादातून एका तरुणास जिवंत जाळले. ही घटना सेलू (जि.परभणी) तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील वालूर रस्त्यावर शनिवारी (१५ जून) सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास घडली. यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jun 2019, 6:12 pm
परभणी:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fire


गावातील नालीच्या किरकोळ कारणावरून झालेल्या जुन्या वादातून एका तरुणास जिवंत जाळले. ही घटना सेलू (जि.परभणी) तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील वालूर रस्त्यावर शनिवारी (१५ जून) सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास घडली. यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

सतीश दत्तराव बरसाले (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. सतीश हा स्वत:चे ट्रॅक्टर सेलू वालूर रस्त्याने घेऊन जात असतांना काही लोकांना त्याला आडवून बेदम मारहाण केली. ट्रॅक्टर मधील डिझेल काढून सतीशच्या अंगावर टाकून भर रस्त्यावर जिवंत जाळले. सेलू पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सेलू पोलीस ठाण्यात सुरू होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज