अ‍ॅपशहर

जुना फॉर्म्युला भाजपला नामंजूर

जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही जागा वाटप करावे, असा शिवसेनेने मांडलेला फॉर्म्युला भारतीय जनता पक्षाने नामंजूर केला. त्यामुळे युतीसंदर्भात झालेली शिवसेना, भाजपची पहिली बैठक निर्णयाविना संपली. बुधवारी किंवा गुरुवारी पुन्हा युतीच्या नेत्यांची बैठक होणार अाहे. दोन्ही पक्षांपैकी कोणीही दोन पावले मागे घेण्यास तयार नसल्याने युतीचा तिढा कायम राहण्याची चिन्हे आहेत.

Maharashtra Times 11 Jan 2017, 3:00 am
Ravindra.Taksal@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम zp election
जुना फॉर्म्युला भाजपला नामंजूर

Tweet : @rtaksalMT
औरंगाबाद ः जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही जागा वाटप करावे, असा शिवसेनेने मांडलेला फॉर्म्युला भारतीय जनता पक्षाने नामंजूर केला. त्यामुळे युतीसंदर्भात झालेली शिवसेना, भाजपची पहिली बैठक निर्णयाविना संपली. बुधवारी किंवा गुरुवारी पुन्हा युतीच्या नेत्यांची बैठक होणार अाहे. दोन्ही पक्षांपैकी कोणीही दोन पावले मागे घेण्यास तयार नसल्याने युतीचा तिढा कायम राहण्याची चिन्हे आहेत.
सर्व गट, गणांतील इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात करून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर दबाब निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे युतीची इच्छा व्यक्त करीत, ‘ती सन्मानाने व्हावी,’ असेही भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत युतीसाठी शिवसेना व भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी यांची सोमवारी रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, आमदार प्रशांत बंब, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, तर शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, अण्णासाहेब माने आदी उपस्थित होते.गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. त्यावेळी जिल्हा परिषदेचे ६० जागा होत्या. भाजपला २४ जागा देण्यात आल्या होत्या. शिवसेनेने ३६ जागा लढविल्या होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या ६२ जागा आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे भाजपने २४ जागांवर, तर उर्वरित जागांवर शिवसेनेने लढावे, असा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. त्याला भाजप नेत्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे बैठकीत अधिक चर्चा होऊ शकली नाही. त्यासाठी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून, बुधवारी किंवा गुरुवारी चर्चेची दुसरी फेरी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

निम्म्या जागांची मागणी
औरंगाबाद जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आहेत. त्याचबरोबर पक्षाचे दोन नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. नगर पालिकांतील नगरसेवकांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे, असा भाजपच्या नेत्यांनी दावा आहे. त्याआधारा भाजपला जिल्हा परिषदेच्या किमान निम्म्या जागा मिळाल्या पाहिजेत, अशी पक्षाची मागणी आहे.

यापूर्वीची गोष्ट वेगळी होती, परंतु आता भाजपची ताकद वाढली आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत युती करण्याची बोलणी सुरूच आहे, पण युती सन्मानाने व्हावी.
- एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष भाजप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज