म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. ४६० गटांपैकी १२९ जागा जिंकून भाजपने मराठवाड्यात पहिले स्थान कमावताना लातूरच्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवले. नांदेड, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि बीडमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे. परभणी आणि उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे.
लातूरची सत्ता पारंपरिक काँग्रेसच्या ताब्यात होती ही सत्ता खेचून आणण्यात भाजपला यश मिळाले आहे. याचे सर्व श्रेय कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना द्यावे लागेल, मात्र बीडच्या कँबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील जागा गमवाव्या लागल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवून दिल्या आहेत. एकहाती सत्ता घेण्यात त्यांना आपयश आले. जिल्हा परिषदेत सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांना अपक्ष किंवा राष्ट्रवादीची साथ घ्यावी लागणार आहे.
माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा सत्ता मिळवून दिली आहे. माजी खासदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबा जानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्यांदा परभणीत सत्ता मिळवून दिली आहे.
औरंगाबाद आणि जालना जिल्हा हा शिवसेनेचा गड मानला जात होता, परंतु त्याला तडा देण्याचे काम भाजपने केले आहे. या दोन्ही जिल्हा परिषदांत प्रत्येकी २२ जागा जिंकून भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे.
पक्षीय संख्याबळ
औरंगाबाद (६२)
शिवसेना १८, भाजप २२, काँग्रेस १६, राष्ट्रवादी ०३, मनसे १, रिपाई कांबळे १, अपक्ष १
जालना (५६)
शिवसेना १४, भाजप २२, काँग्रेस ५, राष्ट्रवादी १३, अपक्ष २
परभणी (५४)
शिवसेना १३, भाजप ३, काँग्रेस ५, राष्ट्रवादी २४, अपक्ष ६
बीड (६०)
शिवसेना ४, भाजप १९, काँग्रेस ०३, राष्ट्रवादी २५, काकू-नाना आघाडी ०३, गोपीनाथ मुंडे आघाडी ०१, अपक्ष ०२, शिवसंग्राम ०३
हिंगोली (५२)
शिवसेना १५, भाजप १०, काँग्रेस १२, राष्ट्रवादी १२, अपक्ष ०३
नांदेड (६३)
शिवसेना १०, भाजप १३, काँग्रेस २८, राष्ट्रवादी १०, अपक्ष २
उस्मानाबाद ५५
शिवसेना ११, भाजप ०४, काँग्रेस १३, राष्ट्रवादी २६, अपक्ष ०१
लातूर (५८)
शिवसेना १, भाजप ३६, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ५, अपक्ष ०१
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. ४६० गटांपैकी १२९ जागा जिंकून भाजपने मराठवाड्यात पहिले स्थान कमावताना लातूरच्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवले. नांदेड, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि बीडमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे. परभणी आणि उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे.
लातूरची सत्ता पारंपरिक काँग्रेसच्या ताब्यात होती ही सत्ता खेचून आणण्यात भाजपला यश मिळाले आहे. याचे सर्व श्रेय कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना द्यावे लागेल, मात्र बीडच्या कँबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील जागा गमवाव्या लागल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवून दिल्या आहेत. एकहाती सत्ता घेण्यात त्यांना आपयश आले. जिल्हा परिषदेत सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांना अपक्ष किंवा राष्ट्रवादीची साथ घ्यावी लागणार आहे.
माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा सत्ता मिळवून दिली आहे. माजी खासदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबा जानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्यांदा परभणीत सत्ता मिळवून दिली आहे.
औरंगाबाद आणि जालना जिल्हा हा शिवसेनेचा गड मानला जात होता, परंतु त्याला तडा देण्याचे काम भाजपने केले आहे. या दोन्ही जिल्हा परिषदांत प्रत्येकी २२ जागा जिंकून भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे.
पक्षीय संख्याबळ
औरंगाबाद (६२)
शिवसेना १८, भाजप २२, काँग्रेस १६, राष्ट्रवादी ०३, मनसे १, रिपाई कांबळे १, अपक्ष १
जालना (५६)
शिवसेना १४, भाजप २२, काँग्रेस ५, राष्ट्रवादी १३, अपक्ष २
परभणी (५४)
शिवसेना १३, भाजप ३, काँग्रेस ५, राष्ट्रवादी २४, अपक्ष ६
बीड (६०)
शिवसेना ४, भाजप १९, काँग्रेस ०३, राष्ट्रवादी २५, काकू-नाना आघाडी ०३, गोपीनाथ मुंडे आघाडी ०१, अपक्ष ०२, शिवसंग्राम ०३
हिंगोली (५२)
शिवसेना १५, भाजप १०, काँग्रेस १२, राष्ट्रवादी १२, अपक्ष ०३
नांदेड (६३)
शिवसेना १०, भाजप १३, काँग्रेस २८, राष्ट्रवादी १०, अपक्ष २
उस्मानाबाद ५५
शिवसेना ११, भाजप ०४, काँग्रेस १३, राष्ट्रवादी २६, अपक्ष ०१
लातूर (५८)
शिवसेना १, भाजप ३६, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ५, अपक्ष ०१