बीड : शेतात धुणे धुण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कासारी येथे घडली. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साक्षी ज्ञानोबा कदम (वय १५) असं मृत मुलीचं नाव आहे. या घटनेनं धारूर तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साक्षीचे आई-वडील ऊस तोडणीसाठी बाहेरगावी कारखान्यास गेल्याने ती तिच्या चुलत्यांकडे राहत होती. साक्षी आपल्या चुलता-चुलतीला घरकामात मदत करत असे. नेहमीप्रमाणे काल साक्षी शेतात विहिरीवर धुणे धुण्यासाठी गेली असता दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास ती पाय घसरून विहिरीत पडली. जीव वाचवण्यासाठी तिने जिवाच्या आकांताने आरडा-ओरड केली. मात्र आसपास कोणीच नसल्याने तिने प्राण गमावले.
विहीर पाण्याने भरलेली असल्याने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यास अडथळ निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांच्या व गावकऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. या घटनेने कदम कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून कासारी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साक्षीचे आई-वडील ऊस तोडणीसाठी बाहेरगावी कारखान्यास गेल्याने ती तिच्या चुलत्यांकडे राहत होती. साक्षी आपल्या चुलता-चुलतीला घरकामात मदत करत असे. नेहमीप्रमाणे काल साक्षी शेतात विहिरीवर धुणे धुण्यासाठी गेली असता दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास ती पाय घसरून विहिरीत पडली. जीव वाचवण्यासाठी तिने जिवाच्या आकांताने आरडा-ओरड केली. मात्र आसपास कोणीच नसल्याने तिने प्राण गमावले.
विहीर पाण्याने भरलेली असल्याने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यास अडथळ निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांच्या व गावकऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. या घटनेने कदम कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून कासारी गावावर शोककळा पसरली आहे.