बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी पायी तिरुपतीला जाणाऱ्या सुमंत रुईकर या शिवसैनिकाचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबाचं पालकत्व स्वीकारले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. आज अखेर मंत्री शिंदे यांनी शब्द पाळलाय. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रुईकर यांच्या घराचे भूमीपूजन करण्यात आलंय. दिवंगत शिवसैनिक रुईकर यांच्या भूमीपूजनाला मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात. तर यापुढील पूर्ण जबाबदारी मंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी असणारे बाजीराव चव्हाण यांच्यावर देण्यात आलीय. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. तर रुईकर कुटुंब शिवसेनेच्या मदतीने भावुक झाले होते.
याचप्रसंगी शिवसेनेचे प्रतिनिधी बाजीराव चव्हाण हे म्हणाले की दिवंगत लोकनेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी त्यांच्या घराचे भूमिपूजन करण्याचे ठरवण्यात आले होते आणि ते आज आम्ही पूर्ण केले आहे आणि आता दोन महिन्यात हे बादकाम तयार करण्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर सुमंत रुईकर यांचे नातेवाईक यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आवाहन केले होते की सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याची गरज आहे. शिवसेनेने रुईकर कुटुंबांचं पालकत्व स्वीकारुन केवळ आधारच दिला नाही तर बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, काय आहे हे दाखवून दिलं आहे. घरातील कुटुंबप्रमुख गेल्यानंतर घर दार उघड्यावर पडू नये, कुटुंबप्रमुखाच्या माघारीही घरदार व्यवस्थित चालावं, यासाठी सेना पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करतायेत.
याचप्रसंगी शिवसेनेचे प्रतिनिधी बाजीराव चव्हाण हे म्हणाले की दिवंगत लोकनेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी त्यांच्या घराचे भूमिपूजन करण्याचे ठरवण्यात आले होते आणि ते आज आम्ही पूर्ण केले आहे आणि आता दोन महिन्यात हे बादकाम तयार करण्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर सुमंत रुईकर यांचे नातेवाईक यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आवाहन केले होते की सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याची गरज आहे. शिवसेनेने रुईकर कुटुंबांचं पालकत्व स्वीकारुन केवळ आधारच दिला नाही तर बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, काय आहे हे दाखवून दिलं आहे. घरातील कुटुंबप्रमुख गेल्यानंतर घर दार उघड्यावर पडू नये, कुटुंबप्रमुखाच्या माघारीही घरदार व्यवस्थित चालावं, यासाठी सेना पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करतायेत.