बीड : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यात जिल्हाबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वेगवेगळ्या कामानिमित्त जिल्ह्याबाहेर गेलेल्या व लॉकडाऊनमुळे बाहेर अडकून पडलेल्या नागरिकांना आता आणखी जास्त अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याची माहिती बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व सीमा सीलबंद करण्यात आल्या आहेत. यापुढे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे प्रवासी वाहन, खासगी कार, टॅक्सी, ऑटो, मोटरसायकल यांना जिल्हा बाहेर जाण्यास परवानगी देण्यात येणार नाही. ज्या व्यक्ती गेल्या पाच दिवसांत परवानगीसह जिल्हा सोडून बाहेर गेल्या आहेत, त्यांना जिल्ह्यामध्ये परत येण्यासाठी आज (२८ मार्च) सकाळी ८ वाजेपर्यंतची मुदत आहे. यानंतर जिल्ह्यातील रहिवाशांनाही प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कळवले आहे.
जिल्हाबंदीचे निर्बंध आणखी कडक
वेगवेगळ्या कामानिमित्त जिल्ह्याबाहेर गेलेल्या व लॉकडाऊनमुळे बाहेर अडकून पडलेल्या नागरिकांना आता आणखी जास्त अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याची माहिती बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2020, 6:50 am