म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र कायम असून, गेल्या तीन महिन्यांमध्ये ३७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. नापिकी आणि दुष्काळासारख्या कारणांबरोबरच, कृषी उत्पादनाला हमी भाव न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून हे टोकाचे पाऊल पडल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये २०१०पासून दुष्काळाचे संकट आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेमध्ये १२५ टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये एकूण ९ लाख २७ हजार ४३० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ८ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली. जिल्ह्यात पिक कापणी प्रयोगावरून खरीप पिकांच्या सरासरी उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचे सिद्ध झाले. जिल्ह्यात १४०३ महसुली गावे आहेत. सर्वच गावांमध्ये तीन वर्षे पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या वर्षी पहिल्यांदा अंतिम पैसेवारी सरासरी ५८.२४ पैसे नोंदविण्यात आली. उत्पादन वाढल्याचे दिसून येत असताना, पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आले आहे. सोयाबीन, तूर यांसारख्या प्रमुखांना दर न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते मार्चपर्यंत ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील जानेवारीमध्ये वीस, फेब्रुवारीत सात तर मार्चमध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील २७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे सरकारी मदतीस पात्र ठरली आहेत. तर, एक शेतकरी आत्महत्या अपात्र ठरली असून, एक प्रकरण चौकशी स्तरावर आहे.
बीड जिल्ह्यामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग ,उडीद, मका, खरीप ज्वारी याच्या उत्पादनात मोठी तूट आली आहे. तसेच, ज्वारी, गहू, हरबरा यासारख खरीप आणि रब्बी उत्पादन शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे, चांगला पाऊस झाल्यानंतरही मिळणाऱ्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र कायम असून, गेल्या तीन महिन्यांमध्ये ३७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. नापिकी आणि दुष्काळासारख्या कारणांबरोबरच, कृषी उत्पादनाला हमी भाव न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून हे टोकाचे पाऊल पडल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये २०१०पासून दुष्काळाचे संकट आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेमध्ये १२५ टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये एकूण ९ लाख २७ हजार ४३० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ८ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली. जिल्ह्यात पिक कापणी प्रयोगावरून खरीप पिकांच्या सरासरी उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचे सिद्ध झाले. जिल्ह्यात १४०३ महसुली गावे आहेत. सर्वच गावांमध्ये तीन वर्षे पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या वर्षी पहिल्यांदा अंतिम पैसेवारी सरासरी ५८.२४ पैसे नोंदविण्यात आली. उत्पादन वाढल्याचे दिसून येत असताना, पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आले आहे. सोयाबीन, तूर यांसारख्या प्रमुखांना दर न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते मार्चपर्यंत ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील जानेवारीमध्ये वीस, फेब्रुवारीत सात तर मार्चमध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील २७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे सरकारी मदतीस पात्र ठरली आहेत. तर, एक शेतकरी आत्महत्या अपात्र ठरली असून, एक प्रकरण चौकशी स्तरावर आहे.
बीड जिल्ह्यामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग ,उडीद, मका, खरीप ज्वारी याच्या उत्पादनात मोठी तूट आली आहे. तसेच, ज्वारी, गहू, हरबरा यासारख खरीप आणि रब्बी उत्पादन शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे, चांगला पाऊस झाल्यानंतरही मिळणाऱ्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.