अ‍ॅपशहर

Beed Railway: अखेर रेल्वे धावली, बीड जिल्ह्यासाठी सुवर्णक्षण, गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न साकार!

Beed Railway :मागील अनेक वर्षांपासूनचे बीड जिल्हावासियांचे स्वप्न आज अखेर पूर्णत्वास गेलं आहे. आज दुपारी आष्टी ते नगर या मार्गावर हाय स्पीड रेल्वे चाचणी झाली. त्यामुळे येत्या काही दिवसात आष्टी ते नगर रेल्वे प्रवास शक्य होणार आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 29 Dec 2021, 7:55 pm
बीड : मागील अनेक वर्षांपासूनचे बीड जिल्हावासियांचे स्वप्न आज अखेर पूर्णत्वास गेलं आहे. आष्टी ते नगर या लोहमार्गाचे साठ किलोमीटर काम पूर्ण झाल्याने, आज या लोहमार्गावर प्रत्यक्षात रेल्वेची हाई स्पीड चाचणी घेण्यात आलीय. बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra beed railway running on nagar beed parali route
बीड रेल्वे


जिल्ह्यात पहिल्यांदाच रेल्वे आल्यानं, हे चित्र डोळ्यात साठवण्यासाठी लहान चिमुकल्यांसह स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. रेल्वे इंजन डब्यांना जोडल्यानंतर स्थानिकांनी रेल्वेला हार आणि फुलं उधळून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केलं. लवकरच या मार्गावर प्रत्यक्षात रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही डॉ. प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.

अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते कडा या ४१ किलोमीटर अंतरावर बुधवारी बारा डब्यांची रेल्वेची चाचणी घेण्यात आली. दुपारी २ वाजता सदरील रेल्वे कडा येथून आष्टी येथे आली. तर दुपारी ४ वाजता आष्टी रेल्वे स्थानकावर खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आता हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आष्टी ते अहमदनगर हायस्पीड रेल्वे धावणार आहे.

आज दुपारी आष्टी ते नगर या मार्गावर हाय स्पीड रेल्वे चाचणी झाली. त्यामुळे येत्या काही दिवसात आष्टी ते नगर रेल्वे प्रवास शक्य होणार आहे. आजच्या सुवर्णक्षणी बोलताना बीडच्या खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या, "आज बीडवासियांचं अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार झालं आहे. मुंडे साहेबांच्या रुपाने पहिल्यांदा या रेल्वे प्रकल्पाला भरघोस निधी प्राप्त झाला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा या रेल्वे प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती मिळाली."

"तसंच राज्यात जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि पंकजाताई बीडच्या पालकमंत्री होत्या, त्यावेळी राज्य सरकारकडून 50 टक्के हिस्सा हा वेळोवेळी मिळत राहिला. त्यामुळेच आज हे स्वप्न पूर्णत्वास येत आहे"

गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न साकार झालं- फडणवीस

"आमचे नेते मा. गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे स्वप्न पूर्ण होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पंकजाताई आणि प्रीतमताई तुम्ही केलेल्या पाठपुराव्याबद्दल अभिनंदन ! आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे आभार", असं ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

महत्वाचे लेख