अ‍ॅपशहर

महावितरणामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान; १३ एकर ऊस, म्हशी आणि २०० कोंबड्या जळून खाक

आग लागल्यानंतर जीव आणि संसार, उपयोगी साहित्य वाचविण्यासाठी अक्षरशः शेतकरी कुटुंबाची मोठी धावपळ उडाली. याच धावपळीचा चित्तथरारक व्हिडीओ मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2022, 1:34 pm
बीड : महावितरणच्या गलथान कारभाराचा कळस पुन्हा एकदा पहावयास मिळाला आहे. ३३ केव्हीची विद्युत तार तुटून वडवणी तालुक्यातील बावी ताडा परिसरातील दामू राठोड आणि शेषेराव राठोड यांचा तब्बल १३ एकर ऊस चार म्हशी आणि दोनशे कोंबड्या जळून खाक झाल्या आहेत. शिवाय प्रल्हाद आडे यांचा गोठा जळून खाक झाला आहे. आग लागल्यानंतर जीव आणि संसार उपयोगी साहित्य वाचविण्यासाठी अक्षरशः शेतकरी कुटुंबाची मोठी धावपळ उडाली. याच धावपळीचा चित्तथरारक व्हिडीओ मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम beed fire
beed fire


कालच माजलगाव तालुक्यातील टालेवाडी गावातील एका घरात विद्युत प्रवाह उतरून दोन बालकांचा करून अंत झाला होता. या घटनेला २४ तास झाले नसतानाच पुन्हा एकदा ही दुर्घटना घडल्याने महावितरण विरोधात रोष व्यक्त होत आहे. मात्र, या महिनाभरात महावितरणचा गलथान कारभाराने अनेक तालुक्यांमध्ये कित्येक एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये अनेकांचा जीवदेखील यामध्ये गमवावा लागला आहे.

लॉकडाऊनमध्ये जुनाट दुचाकी विकून घोडा खरेदी केला; आता चक्क घोड्यावर निघाले नोकरीला
गेवराई तालुक्यातील तारेला चिटकून तो चिमुकला जीवाशी गेला. त्यानंतर माजलगावची घटना आणि आता बावी तांडावरील हा चित्तथरारक प्रसंग. यामुळे महावितरण कंपनीला आणखी किती शेतकऱ्यांचे व प्राण्यांचे जीव घ्यायचे आहेत? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारण्यात आला आहे. मात्र, आता याची जबाबदार कोण घेणार ? आणि या संकटावर कशा पद्धतीने मात करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

बळीराजाचं इतकं नुकसान झालं असलं तरही या विषयावर महावितरणचे कर्मचारी ना पाहायला तयार न बोलायला तयार. यामुळे शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला असून कोणाकडे दाद मागायची असा मोठा प्रश्न आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज