अ‍ॅपशहर

जेंव्हा त्यानं हजेरीपटावरून जात खोडली...

'जात नाही ती जात', असं सांगत अनेकजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जातीचं समर्थन करत असतात. त्यामुळे जातीही नष्ट होत नाहीत आणि जातीमुळं होणारं नुकसानही टाळता येत नाही. बीडमध्ये मात्र रोहन भोसले या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं जातीविरोधात लढण्याचं धाडसी पाऊल उचललयं. त्यानं शाळेच्या हजेरीपटावरून स्वत:ची जात आणि धर्मच खोडून काढला असून त्याच्या या कृतीचं सर्वजण कौतूक करत आहेत.

Maharashtra Times 9 Jan 2017, 2:52 pm
मटा ऑनलाइन वृत्त । बीड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohan bhosle erase his cast from attendance sheet
जेंव्हा त्यानं हजेरीपटावरून जात खोडली...


'जात नाही ती जात', असं सांगत अनेकजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जातीचं समर्थन करत असतात. त्यामुळे जातीही नष्ट होत नाहीत आणि जातीमुळं होणारं नुकसानही टाळता येत नाही. बीडमध्ये मात्र रोहन भोसले या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं जातीविरोधात लढण्याचं धाडसी पाऊल उचललयं. त्यानं शाळेच्या हजेरीपटावरून स्वत:ची जात आणि धर्मच खोडून काढला असून त्याच्या या कृतीचं सर्वजण कौतूक करत आहेत.

आष्टी तालूक्यातील पारगावच्या जिल्हा परिषद शाळेत रोहन शिकतो. रोहन शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. तो देव आणि धर्मही मानत नाही. शाळेतील हजेरीपटावर विद्यार्थ्यांच्या नावासमोरच्या कॉलममध्ये त्याची जात आणि धर्म लिहिला जात असल्याचं त्याला खटकत होतं. त्यामुळं त्यानं शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गात शिक्षक नसल्याची संधी साधत हजेरीपटावरून स्वत: जात खोडून टाकली. जवळ पेन नव्हता, त्यामुळं वर्ग मैत्रिणीचा पेन घेऊन त्यानं हजेरीपटावरून जात काढून टाकण्याचं मिशन फत्ते केलं.

रोहननं जात खोडल्याचं घरी कळताच त्याचे आई-वडिल घाबरले. पण गावकरी आणि शिक्षकांनी त्याच्या या कृतीचं समर्थन केल्यानं रोहनच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना जे संस्कार देतो, ते रोहनमुळे खऱ्या अर्थानं सार्थकी लागल्याचं त्याचे शिक्षक सागंतात. रोहनच्या या कृत्याचा अभिमान असून त्याचा हा संकल्प सरकारी पातळीवर राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिक्षकांनी सांगितलं.

शिवराय, फुले आणि आंबेडकर प्रेरणास्त्रोत

इतर मुलांसारखं टाइमपास करणं आणि खेळणं यात रोहनला इंटरेस्ट नाही. तो नियमितपणे किर्तन ऐकतो. वाचन करतो आणि घरच्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे विचार सांगत असतो. या तीन महापुरुषांच्या विचाराच्या पगड्यातूनच त्याला हजेरीपटावरून जात खोडण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगण्यात येतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज